शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 17:22 IST

कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. 

जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील देशांना कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आवाहन केलं आहे. कोरोना संक्रमणाची माहिती मिळण्यासाठी ज्या लोकांमध्ये  कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशा लोकांचीही चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कोविड १९ च्या प्रसाराबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख मारिया वान केरखोवे (Head of Technology, Maria Van Kerkhove) यांनी एका संम्मेलनादरम्यान सांगितले की, कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. 

ज्या  रुग्णांमध्ये  संक्रमणाची सौम्य लक्षणं  दिसत आहेत किंवा जराही लक्षणं  दिसत नसलेल्या रुग्णांचीही तपासणी करायला हवी. याआधीही अमेरिकेतील आरोग्य संस्थेनं आपल्या नियमांमध्ये बदल करत संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत अशा लोकांना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. 

अमेरिकेच्या नवीन गाईडलाईन्स कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी नाहीत

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राकडून(Centers for Disease Control and Prevention) स्थानिक आरोग्य अधिकारी वर्गाला सांगण्यात आलं की, संक्रमत व्यक्तीच्या आजबाजूला 1.8 मीटर परिसरात 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जी व्यक्ती संपर्कात आली आहे त्यांची तपासणी करणं अनिवार्य आहे. आता नवीन गाईडलाईन्सनुसार  संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील तर चाचणी करणं अनिवार्य नाही. परिणामी संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

लोकांकडून सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही

केरखोवे यांनी सांगितले की, कोरोनाची करणं चाचणी गरजेचं असून संक्रमित लोक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना वेगळं ठेवून त्यांची तपासणी होणं तितकंच महत्वाचं आहे. संक्रमण रोखण्यासाठी तसंच व्हायरसची चेन तोडण्यास यामुळे मदत होईल. लोकांकडून सोशल डिस्टेंसिंगचं पालन अजूनही व्यवस्थित केलं जात नाही. मास्क लावल्यानंतरही दीड मीटरचं अंतर पाळायला हवं असंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ७५,७६० रुग्ण आढळून आले. जगभरातील कोणत्याही देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आजवर आढळले नव्हते. त्यामुळे तो विक्रमही आता भारताच्या नावावर जमा झाला आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता ७६.२४ टक्के झाले असून, त्यांची संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणखी १,०२३ जण मरण पावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ६०,४७२ झाला आहे. या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.सध्या देशात 7,25,991 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 21.93% इतकी आहे. दररोज होत असलेल्या कोरोना चाचण्यांचे वाढते प्रमाण, रुग्णांवर वेळीच होणारे उपचार यामुळे मृत्युदर 1.83% इतका कमी राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.

हे पण वाचा-

दिलासादायक! भारतात २०२१ च्या सुरुवातीला लस येणार; ४४० रुपयांना उपलब्ध होणार, तज्ज्ञांचा दावा

फुफ्फुसांच्या आजारांना लांब ठेवण्यााठी 'सेल्फ केयर टिप्स' ठरतील प्रभावी, नेहमी राहाल निरोगी

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य