शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोणत्या वेळी आणि शरीराच्या कोणत्या भागांवर जास्त चावतात डेंग्यूचे डास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:47 IST

डेंग्यूचे डास इतर डासांपेक्षा वेगळे असतात. इतकंच नाही तर त्यांचा चावण्याची वेळ आणि पद्धतही वेगळी असते.

आजकाल डेंग्यूच्या केसेस खूप जास्त वाढत आहेत आणि डेंग्यूमुळे काही लोकांचा जीवही जात आहे. डेंग्यूचा हैदोस पाहता कर्नाटकात या आजाराला महामारी घोषित करण्यात आलं आहे. डेंग्यू हा एक गंभीर आजार असून डास चावल्याने पसरतो. अशात या आजारापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

डेंग्यूचे डास इतर डासांपेक्षा वेगळे असतात. इतकंच नाही तर त्यांचा चावण्याची वेळ आणि पद्धतही वेगळी असते. डेंग्यूच्या डासांना एडीज एजिप्टी आणि एडीज एल्बोपिक्टस म्हटलं जातं. सामान्यपणे डेंग्यूची लक्षणं दोन ते तीन दिवसात दिसू लागतात. वेळीच यावर उपचार घेतले नाही तर जीवाला धोका होतो.

कधी चावतात हे डास?

डेंग्यूचे डाग सगळ्यात जास्त दिवसाच्या वेळी चावततात. सामान्यपणे ते सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान आणि दुपारी ३ ते ५ दरम्यान जास्त अॅक्टिव असतात. याचं कारण यावेळात लोक घरातील कपडे घालतात जसे की, शॉर्ट, पायजामा, टी-शर्ट यामुळे त्यांना चावण्यास सोपं होतं. रात्री जर त्यांना भरपूर प्रकाश मिळाला तर तेव्हाही ते चावतात. 

डेंग्यूचे डास एडीज एजिप्टी आणि एडीज एल्बोपिक्टस हे व्यक्तीच्या खुल्या जागेवर चावतात. एजीज एजिप्टी गरमी आणि मानवी घामातून निघणाऱ्या विशिष्ट तत्वाकडे आकर्षित होतात. गरम जागा किंवा वातावरणात सगळ्यात जास्त घाम पायांवर आणि टाचांवर येतो. अशात या जागांवर डास जास्त चावतात.

शरीरावर कुठे जास्त चावतात?

जेव्हा व्यक्ती श्वास सोडते तेव्हा त्यातून CO2 निघतो. डास हे हवेत पसरलेल्या गंधाला ओळखण्यात पटाईत असतात, अशात ते हात, पाय किंवा काखेच्या मोकळ्या जागेवर चावतात. तसे डेंग्यूचे डास हात, पाय, मान आणि चेहऱ्यावरही चावू शकतात.

डेंग्यूपासून बचावाचे उपाय

- लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पॅंट घाला. त्याशिवाय घरात सॉक्स घालूनही राहू शकता.

- दरवाजे आणि खिडक्यांना जाळ्या लावा. तसेच मच्छदानीचा वापर करा. कारण एडीज एजिप्टी डास दिवसा जास्त अॅक्टिव असतात. 

- भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवू नका. कूलरमध्येही डास वाढतात. त्यांची नियमितपणे स्वच्छता करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य