शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! पहिल्यांदाच भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं, कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:59 IST

CoronaVirus News & latest Updates : कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार  याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढत आहे. दररोज ९० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येचा विचार करता भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष कोरोना लसीकडे लागलं आहे.  दरम्यान भारतीय तज्ज्ञांनी याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. 

कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार  याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले असू. म्हणजेच पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत कोरोना व्हायरसंच संकट कमी होईल. जनजीवन सुरळीत होईल असा दावा एम्सच्या तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी असं मत व्यक्त केलं आहे. वृत्तसंस्था एएनआयनं यासंबंधी ट्विट केलं आहे. 

यावेळी डॉ. संजय राय म्हणाले की, "भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या टप्प्यातील  चाचणी सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लसींपैकी कोणतीही कोरोना लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. पण लस नाही आली तरीसुद्धा पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण जोपर्यंत कोरोनाविरोधात प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.''

पुढील वर्षी उपलब्ध होईल कोरोना लस, पण...; आरोग्यमंत्र्यांनी सांगितली सर्वात मोठी अडचण

कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल, अशी माहिती हर्षवर्धन यांनी संसदेत दिली. मात्र ती सर्वांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, असंही ते पुढे म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढाईत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितलं. यावेळी विरोधकांनी कोरोना लसीच्या उपलब्धतेसोबतच तिच्या किमतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्यापूर्वीच संकटाचा सामना करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. '८ जानेवारीला कोरोना संकटाबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यानंतर १७ जानेवारीला आरोग्य व्यवस्था सज्ज ठेण्यास सुरुवात करण्यात आली. नियमावली जारी केली गेली. यानंतर २० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. तो चीनमधून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १६२ जणांचा शोध घेण्यात आला,' असा तपशील आरोग्यमंत्र्यांनी दिला.

'कोरोना संकटाचा सामना करताना देशात पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि मास्कचा तुटवडा जाणवेल, असं अनेकजण म्हणत होते. वृत्तवाहिन्यांवर डिबेट सुरू होत्या. मात्र आपण या लढाईत फार वेगानं पुढे सरकलो. सध्याच्या घडीला देशात शेकडो कोरोना तपासणी केंद्रं आहे. केंद्र सरकारनं कोणताही भेदभाव न करता सर्व राज्यांना योग्य मदत आणि सहकार्य केलं आहे,' असं हर्षवर्धन यांनी सभागृहाला सांगितलं.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्यापूर्वीच संकटाचा सामना करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. '८ जानेवारीला कोरोना संकटाबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यानंतर १७ जानेवारीला आरोग्य व्यवस्था सज्ज ठेण्यास सुरुवात करण्यात आली. नियमावली जारी केली गेली. यानंतर २० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. तो चीनमधून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १६२ जणांचा शोध घेण्यात आला,' असा तपशील आरोग्यमंत्र्यांनी दिला.

हे पण वाचा-

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या