शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सुपरड्रिंक जे उन्हाळ्यात जास्त पिण्याचा सल्ला देतात एक्सपर्ट, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:30 IST

डायटीशियन डॉ. भावेश गुप्ता यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, उन्हाळ्यात सुपरड्रिंक कोणतं ठरू शकतं.

Healthy Drinks: दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. उष्णतेमुळे, घामामुळे आणि उन्हाच्या चटक्यांमुळे लोक हैराण झाले आहेत. जास्त तापमानामुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होत आहेत. अशात एक्सपर्ट या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात. शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पेयांचं आणि आहार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात डायटीशियन डॉ. भावेश गुप्ता यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, उन्हाळ्यात सुपरड्रिंक कोणतं ठरू शकतं. ज्यामुळे शरीराचं तापमान योग्य राहतं आणि आरोग्यही चांगलं राहतं.

डॉ. भावेश यांनी सांगितलं की, नारळाचं पाणी एक चांगलं सुपरड्रिंक आणि समरड्रिंक ठरू शकतं. या दिवसांमध्ये नारळ पाण्याचं नियमित सेवन केल्याने शरीरात हायड्रेशन कायम राहतं. म्हणजे नारळ पाण्यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाण्याची कमतरता भरून निघते. नारळ पाणी तुम्ही एक्सरसाइजनंतरही पिऊन शकता. एक्सरसाइज करताना किंवा उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणाऱ्या घामाच्या माध्यमातून शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. ते परत मिळवण्यासाठी नारळ पाणी मदत करतं. 

डॉ. भावेश यांच्यानुसार, नारळ पाण्याशिवाय उन्हाळ्यात मोसंबीचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस किंवा ओआरएसचं सेवन करावं. याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा तयार होतात. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी रोज नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं मानलं जातं की ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात नारळ पाण्याचं मोठं योगदान असतं. म्हणजे हे पाणी ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यास मदत करतं. ज्याने तुम्हाला हार्टसंबंधी समस्या होत नाहीत किंवा टाळता येतील.

इम्यूनिटी होईल मजबूत

नारळ पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. एका नारळ पाण्यात साधारण 600 मिलिग्रॅम पोटॅशिअम असतात. ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि अनेक आजारांसोबत लढण्याची आपल्याला शक्ती मिळते.

उलटी येण्यावरही फायदेशीर

उलटी आणि जुलाबाची समस्या असेल तर नारळ पाणी फार फायदेशीर ठरतं. अशात जर तुम्ही नारळ पाणी पिलात तर तुम्हाला याचे अनेक फायदे होतील. नारळ पाणी प्यायल्याने उलटी, जुलाब, पोटात जळजळ, आतड्यांवरील सूज आणि अल्सरची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

किडनी राहते निरोगी

नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम अधिक राहत असल्याने किडनीलाही अनेक फायदे मिळतात. नारळ पाण्याचं नियमित सेवन केल्याने किडनीचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होतात.

त्वचा आणि केसांना फायदा

त्वचा आणि केसांना नारळ पाण्याने भरपूर फायदा मिळतो. नारळ पाण्याने त्वचेचं टेक्स्चर अधिक चांगलं होतं आणि त्वचा चमकदार व ताजी दिसते. रोज नारळ पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना आतून भरपूर पोषण मिळतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य