शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:49 IST

Right time to sleep : झोप येण्यासाठी बाजारात अनेक औषधं मिळतात, पण आयुर्वेदानुसार झोपण्यासोबतच झोपण्याची वेळही महत्वाची आहे.

Right time to sleep : दिवसातील २४ तासांपैकी किमान ७ ते ८ तास झोप घेणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर चांगली झोप झाली तर आरोग्य चांगलं राहतं. झोप जर योग्य पद्धतीने होत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. झोप येण्यासाठी बाजारात अनेक औषधं मिळतात, पण आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथीमध्ये यावर सोपे आणि सरळ उपाय आहेत. इतकंच नाही तर झोपण्याची योग्य वेळही सांगण्यात आली आहे. 

आयुर्वेदात उपचार व्यक्तीची प्रकृती बघूनच केले जातात. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, वात, पित्त आणि कफ या तिघांचं जेव्हा बॅलन्स बिघडतं तेव्हाच कुणी आजारी पडतं. आयुर्वेदात योग्य जीवनशैलीला फार महत्वं आहे.

निरोगी जीवनाचे तीन स्तंभ

१) पौष्टिक आहार

२) पुरेशी झोप

३) इंद्रियांवर नियंत्रण

जेवणानंतर झोप येणं ही एक सामान्य बाब आहे. जर झोप कमी झाली तर शरीराचं तंत्र बिघडतं. झोप न झाल्याने तब्येत तर बिघडतेच सोबतच याने मानसिक आरोग्य देखील खराब होतं.

चांगली झोप का आहे गरजेची?

तर तुम्ही रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतली नाही तर दुसऱ्या तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही रात्री चांगली झोप घेतली तर तुमचं चित्त शांत राहतं. दुसऱ्या दिवशी शरीरात भरपूर एनर्जी राहते आणि तुम्हालाही फ्रेश वाटतं. त्यामुळे पुरेशी झोप महत्वाची ठरते.

आयुर्वेदात झोपेला बलवर्धक म्हटलं गेलं आहे. चांगली झोप घेतल्याने इम्यूनिटीही बूस्ट होते. जर झोप पूर्ण झाली नसेल तर व्यक्तीचं वजन कमी होऊन ती आजारी पडू शकते. तसेच जागी राहिल्यावर जास्त खाऊन ते जाडही होऊ शकतात. चांगल्या झोपेने लैंगिक जीवनही हेल्दी राहतं.

रात्री झोपण्याची योग्य वेळ

प्रयत्न तर हाच असला पाहिजे की, रोज रात्री तुम्ही ९ ते १० वाजतादरम्यान झोपावं आणि सकाळी ४ ते ५ वाजता उठावं. आयुर्वेदात झोपण्यासाठी हीच वेळ सगळ्यात चांगली मानलं जातं. जर काही कारणाने या वेळेत झोपू शकत नसाल तर ६ ते ८ तासांची झोप पूर्ण करूनच उठावं. 

झोपण्याआधी आंघोळ

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ करावी. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. जर आंघोळ करणं शक्य नसेल तर पाण्याने चेहरा, डोकं, काख, पाय, हाय चांगले धुवावे. तेच जर हिवाळ्यात आंघोळ करणं शक्य नसेल तर गरम पाण्याने चेहरा आणि पाय धुवावे. याने पायांच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि रात्री चांगली झोप लागते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य