शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उपवास केल्याने शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर नेहमीच कराल उपवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:43 IST

Fasting Benefits : उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. अशात आज आपण उपवास करण्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

Fasting Benefits : श्रावण सुरू होणार आहे. अशात जास्तीत जास्त लोक सोमवारी उपवास करतात. अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि दिवसाच्या शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. याशिवाय अनेकजण आठवड्यातून एका दिवशी उपवास धरतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. अशात आज आपण उपवास करण्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

उपवासाचं महत्व

आयुर्वेदासहीत दुसऱ्या सर्वच चिकित्सेमध्ये उपवास म्हणजेच पोट रिकामं ठेवण्याची प्रथा आहे. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक आजारावर उपाय म्हणून उपवास केला जावा, पण अनेक समस्यांवर उपवास हा चांगला उपचार ठरतो. आयुर्वेदात आजार दूर करण्यासाठी शरीरातील विषारी तत्व दूर करण्याबाबत सांगण्यात आलं आहे आणि उपवास केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते. त्यामुळेच उपवासाला आयुर्वेदात सर्वोत्तम औषधी मानलं आहे. 

हे आजार केले जाऊ शकतात दूर

जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रियाच चांगली होतेच सोबतच अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. उपवास केल्याने आर्थरायटिस, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, सततचा थकवा, कोलायटिस, स्पास्टिक कोलन, इरिटेबल बॉवेल आणि अनेक प्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते. 

वजन कमी होतं

उपवास केल्याने शरीराचा लठ्ठपणा कमी होतो. जेवणाच्या पद्धतीत बदल करून उपवास केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.

इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते

उपवास केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कार्बोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्सुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

मेटाबॉलिज्झची बूस्ट होतं

उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटाबॉलिझमला कॅलरी बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फूड मेटाबॉलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटाबॉलिझमची कार्यक्षमता वाढते.

मेंदुच्या क्रिया वाढतात

उपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते

इम्युन सिस्टीममध्ये सुधारणा

कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते.

शरीरिक क्षमता वाढतात

वेगवेगळ्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा असतो. शरीरातील पचन तंत्रात अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात आणि सोबतच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह सुद्धा वाढतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य