शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:15 IST

Health Tips: बाबा रामदेवांचे शरीर लवचिक होण्यामागे योगाभ्यास जितका कारणीभूत आहे तेवढेच त्यांचे हेल्दी डाएटही महत्त्वाचे आहे; ते जाणून घेऊ!

बाबा रामदेव हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ते त्यांचे पोटातल्या पोटात गोलाकार फिरणारे मिक्सर ग्राइंडर! योगविद्येच्या अभ्यासातून त्यांनी शरीराला अत्यंत लवचिक बनवले आहे. त्यांचं वळणारं अंगं पाहून बघणाऱ्यांची बोबडी वळते. ते विविध शहरातून, देशातून फिटनेसचे धडे देतात, योग शिबीर आयोजित करतात, हेल्थ टिप्स देतात. निवासी शिबीर घेऊन लोकांचे वजन उतरवण्याला हातभार लावतात. त्यांनी त्यांचे हेल्थ सिक्रेट शेअर करत असतानाच अमित शाह यांचे २५ किलो वजन कसे कमी झाले हेही सांगितले आहे. 

बाबा रामदेव यांची जीवनशैली आणि आहार कसा आहे ते पाहू!

रामदेव बाबा आयुर्वेदावर भर देतात आणि लोकांनाही आयुर्वेदिक औषधांचा वापर करा असे सांगतात. मात्र स्वतः बाबाजींना कोणत्याही औषधाची विशेष गरज लागत नाही. कारण योग्य आहारपद्धतीचा अवलंब करून त्यांनी स्वतःचे स्वास्थ्य उत्तम ठेवले आहे. त्यांच्यासारखे निरोगी शरीर आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर त्यांची आहारपद्धती अनुसरायला हवी. 

बाबा रामदेव सांगतात.... 

आपल्या आरोग्याच्या बाबतीत ८० टक्के डाएट आणि २० टक्के व्यायाम याचा सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतो. व्यायामाने शरीर लवचिक होतं आणि ध्यानधारणेने मग शांत आणि स्थिर होतं. ध्यान स्थिर होण्यासाठी वासना कमी करायला हव्यात. म्हणून सर्वप्रथम आहारावर नियंत्रण हवे! ते पुढीलप्रमाणे करता येईल. 

निरोगी आयुष्य जगण्यासाठी बाबा रामदेवांच्या टिप्स आणि अमित शाह यांच्या वेट लॉसचे सिक्रेट : 

>> सकाळी उठल्यावर गायीचे एक चमचा शुद्ध तूप खा. 

>>  तेलकट, गोड पदार्थ टाळा, निदान कमी करा. अतिरिक्त मिठाचे सेवन टाळा. 

>> शक्य तेवढं धान्य कमी खा! बैठं काम करणाऱ्यांना धान्य खाण्याची गरज नाही, खाल्ल्यास ते नीट पचत नाही आणि त्याचे रूपांतर ऊर्जेत न होता चरबीत रूपांतर होते. भात, पोळी, भाकरी याची गरज कष्टकरी लोकांना जास्त असते. बैठे काम करणाऱ्यांनी नैसर्गिक, ताज्या गोष्टींचे सेवन करा. 

>> ७-८ तास झोप आवश्यक असे सगळे सांगतात, पण कोणासाठी? तर शारीरिक काम करणाऱ्यांसाठी! बैठे काम करणाऱ्यांनी तसेच चाळीशी ओलांडलेल्या लोकांना ६ तास झोप पुरेशी ठरते. 

>> जेवणाच्या सुरुवातील कच्या भाज्या, फळे जास्तीत जास्त खा!त्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो आणि मग खाल्लेले जेवण पचते. 

>> ज्यांना शक्य असेल त्यांनी उपासाच्या दिवशी फक्त नारळपाणी प्यावे आणि फार तर फलाहार करावा. 

>> चाळीशीनंतर एक वेळच जेवा. सगळ्या रोगांपासून दूर राहाल! बाबा रामदेव दुपारी १२ वाजता दिवसातून एकदाच जेवतात. जेवणात फळं, सॅलड खाऊन झाल्यावर शुद्ध तुपात किंवा राईच्या तेलात शिजवलेले अन्नच खातात. 

>> संध्याकाळी ७ नंतर जेवू नका, आपसूक इंटरमिटंट फास्टिंग घडेल. अमित शाह यांनी देखील याच पद्धतीचा अवलंब करून २५ किलो वजन कमी केले. 

>> आहार आणि विचारात सकारात्मकता आणा, सक्रिय राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यBaba Ramdevरामदेव बाबाAmit Shahअमित शाह