शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 14:15 IST

Health Tips: बाबा रामदेवांचे शरीर लवचिक होण्यामागे योगाभ्यास जितका कारणीभूत आहे तेवढेच त्यांचे हेल्दी डाएटही महत्त्वाचे आहे; ते जाणून घेऊ!

बाबा रामदेव हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ते त्यांचे पोटातल्या पोटात गोलाकार फिरणारे मिक्सर ग्राइंडर! योगविद्येच्या अभ्यासातून त्यांनी शरीराला अत्यंत लवचिक बनवले आहे. त्यांचं वळणारं अंगं पाहून बघणाऱ्यांची बोबडी वळते. ते विविध शहरातून, देशातून फिटनेसचे धडे देतात, योग शिबीर आयोजित करतात, हेल्थ टिप्स देतात. निवासी शिबीर घेऊन लोकांचे वजन उतरवण्याला हातभार लावतात. त्यांनी त्यांचे हेल्थ सिक्रेट शेअर करत असतानाच अमित शाह यांचे २५ किलो वजन कसे कमी झाले हेही सांगितले आहे. 

बाबा रामदेव यांची जीवनशैली आणि आहार कसा आहे ते पाहू!

रामदेव बाबा आयुर्वेदावर भर देतात आणि लोकांनाही आयुर्वेदिक औषधांचा वापर करा असे सांगतात. मात्र स्वतः बाबाजींना कोणत्याही औषधाची विशेष गरज लागत नाही. कारण योग्य आहारपद्धतीचा अवलंब करून त्यांनी स्वतःचे स्वास्थ्य उत्तम ठेवले आहे. त्यांच्यासारखे निरोगी शरीर आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर त्यांची आहारपद्धती अनुसरायला हवी. 

बाबा रामदेव सांगतात.... 

आपल्या आरोग्याच्या बाबतीत ८० टक्के डाएट आणि २० टक्के व्यायाम याचा सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतो. व्यायामाने शरीर लवचिक होतं आणि ध्यानधारणेने मग शांत आणि स्थिर होतं. ध्यान स्थिर होण्यासाठी वासना कमी करायला हव्यात. म्हणून सर्वप्रथम आहारावर नियंत्रण हवे! ते पुढीलप्रमाणे करता येईल. 

निरोगी आयुष्य जगण्यासाठी बाबा रामदेवांच्या टिप्स आणि अमित शाह यांच्या वेट लॉसचे सिक्रेट : 

>> सकाळी उठल्यावर गायीचे एक चमचा शुद्ध तूप खा. 

>>  तेलकट, गोड पदार्थ टाळा, निदान कमी करा. अतिरिक्त मिठाचे सेवन टाळा. 

>> शक्य तेवढं धान्य कमी खा! बैठं काम करणाऱ्यांना धान्य खाण्याची गरज नाही, खाल्ल्यास ते नीट पचत नाही आणि त्याचे रूपांतर ऊर्जेत न होता चरबीत रूपांतर होते. भात, पोळी, भाकरी याची गरज कष्टकरी लोकांना जास्त असते. बैठे काम करणाऱ्यांनी नैसर्गिक, ताज्या गोष्टींचे सेवन करा. 

>> ७-८ तास झोप आवश्यक असे सगळे सांगतात, पण कोणासाठी? तर शारीरिक काम करणाऱ्यांसाठी! बैठे काम करणाऱ्यांनी तसेच चाळीशी ओलांडलेल्या लोकांना ६ तास झोप पुरेशी ठरते. 

>> जेवणाच्या सुरुवातील कच्या भाज्या, फळे जास्तीत जास्त खा!त्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो आणि मग खाल्लेले जेवण पचते. 

>> ज्यांना शक्य असेल त्यांनी उपासाच्या दिवशी फक्त नारळपाणी प्यावे आणि फार तर फलाहार करावा. 

>> चाळीशीनंतर एक वेळच जेवा. सगळ्या रोगांपासून दूर राहाल! बाबा रामदेव दुपारी १२ वाजता दिवसातून एकदाच जेवतात. जेवणात फळं, सॅलड खाऊन झाल्यावर शुद्ध तुपात किंवा राईच्या तेलात शिजवलेले अन्नच खातात. 

>> संध्याकाळी ७ नंतर जेवू नका, आपसूक इंटरमिटंट फास्टिंग घडेल. अमित शाह यांनी देखील याच पद्धतीचा अवलंब करून २५ किलो वजन कमी केले. 

>> आहार आणि विचारात सकारात्मकता आणा, सक्रिय राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यBaba Ramdevरामदेव बाबाAmit Shahअमित शाह