शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:30 IST

Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी 'भरपूर पाणी प्या' हा सल्ला दिला जातो, पण भरपूर म्हणजे नेमके किती त्याचे प्रमाण आणि फायदे जाणून घ्या. 

वाढते वजन ही वेगाने वाढणारी समस्या आहे. सगळ्या वयोगटात वजन वाढीची समस्यां दिसून येत आहे. त्याला बहुतांश जबाबदार आहे आपली दिनचर्या आणि चुकीची आहारपद्धती. ज्याला खरोखरच वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहार नियोजनाची शिस्त, पुरेसा व्यायाम, आठ तास झोप आणि बाहेरच्या खाण्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. पोटापुरतेच जेवले पाहिजे. जिभेचे चोचले पुरवायचे या हेतूने अन्न ग्रहण करू नये. असे सल्ले आरोग्य शास्त्रात दिले जातात. त्याबरोबर एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा! पण भरपूर पाणी पिण्याने खरोखरच वजन कमी होते का? आणि झाले तरी त्यासाठी नेमके किती लिटर पाणी दररोज प्यायला हवे ते जाणून घ्या. 

पाणी पिण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्यात शून्य कॅलरी असते. त्यामुळे ते कितीही प्यायले तरी वजन वाढत नाही, उलट भूक शमते, पोट भरलेले असल्याची तृप्ती मिळते, भूक कमी होते आणि वजन कमी करण्यात मदत होते. यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. अन्नात समाविष्ट असलेल्या पाण्याव्यतिरिक्त पाणी प्यायले गेले पाहिजे असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण नेमके किती? तेही पुढे जाणून घेऊया. 

वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग करावे का?

वॉटर फास्टिंग म्हणजे पाण्यावर राहून उपास. यासाठी कोणतेही डॉक्टर परवानगी देत नाही. या उपायाने तुम्ही सलग आठवडाभर तग धरून राहू शकता, वजनही कमी होऊ शकते, परंतु शरीरात त्राण उरणार नाही, भुकेचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकेल. म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोष्टी करू नयेत. 

शीतपेय नको, पाणीच प्या: 

दुधाची तहान ताकावर भागवणे ठीक आहे, पण कोल्ड्रिंक वर नको! कोल्ड्रिंक वजनवाढीला पूरक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु कराल, तेव्हा तेव्हा कोल्ड्रिंकच्या जागी कोमट पाणी किंवा माठातले पाणी प्या आणि तहान भागवा. जेणेकरून पोट भरेल आणि कॅलरी पण वाढणार नाहीत. 

अधिक पाणी पिण्याच्या टिप्स

>> प्रत्येक वेळी काही खाण्याआधी पाणी प्या. त्यामुळे दोन घास कमी खाल्ले जातील. >> कुठेही जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि दर अर्ध्या तासाने एक एक घोट पाणी पित राहा. >> व्यायाम करताना किंवा शारीरिक कामे करताना जास्त पाणी प्या.>> दमट वातावरण तसेच प्रखर सूर्यप्रकाश असताना भरपूर पाणी प्या.>> झोपताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. रात्री तहान लागल्यावर उठण्याचा कंटाळा करणार नाही. >> व्हेजिटेबल सूप तसेच वरण, आमटी, ताक यांचे प्रमाण जेवणात वाढवा. >> जास्त पाणी असलेली फळे आणि भाज्या खा, विशेषत: बेरी, द्राक्षे, कलिंगड, टोमॅटो, काकडी इ. चा वापर करा. 

नेमके किती पाणी प्यावे : 

आरोग्य शास्त्रानुसार स्त्रियांनी ८ ग्लास तर पुरुषांनी १३ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होईल आणि वजन कमी व्हायला मदत होईल. 

टॅग्स :Healthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स