शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उन्हाळ्यात कोथिंबीर उपयोगी भारी : झटपट सारे रोग दूर करी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 20:20 IST

तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे.

पुणे :  तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे. चला तर बघूया कोथिंबीरीचे फायदे आणि उपयोग :

त्वचेची आग थांबवते :

उन्हात फिरून आल्यावर अंगाची आग होत असेल किंवा जळजळ वाटत असेल तर कोथिंबिरीचा रसत्या जागेवर लावा. तेवढे शक्य नसेल तर कोथिंबिरीच्या काड्या आणि पानं हाताने चुरून हलक्या हाताने दाह होणाऱ्या जागी लावा. काही वेळात थंडावा जाणवायला सुरुवात होईल. 

मळमळ थांबवते :

पाणी कमी झाल्याने किंवा ऊन लागल्याने अनेकदा उन्हाळ्यात मळमळ होते. उलटीची भावना होते मात्र उलटी होत नसल्याने अस्वस्थ वाटते अशावेळी मळमळ थांबवण्यासाठी कोथिंबिरीची आठ ते दहा पानं चावून खाल्याने बरं वाटते. त्यानंतर त्यावर पाव चमचा साखर खाल्ल्याने तात्काळ फरक पडेल. 

मुरुमंही होतात दूर :

उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या घामामुळे आणि तेलामुळे धूळ बसून मुरुमाचे आणि फोडाचे प्रमाण वाढते. अशावेळी दोन चमचे कोथिंबीर रसात चिमूटभर हळद लावून तो पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. वाळल्यावर हलक्या हाताने चोळून चेहरा थंड पाण्याने धुवावा. 

पोटदुखीपासून आराम :

पोटदुखीमुळे होणाऱ्या वेदनाही कोथींबिरीमुळे दूर होतात. गॅस, अपचन झाले असल्यास आंबट नासलेल्या ताज्या टाकत कोथिंबिरीचा रस,हिंग आणि काळे मीठ टाकून घेतल्यास फरक पडतो. 

डोळ्यांचे आरोग्य सुधारते :

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लागणारे व्हिटॅमिन ए कोशिंबिरीत मोठ्या प्रमाणात असल्याने नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. 

अशी साठवा कोथिंबीर :

एका हवाबंद स्टीलबंद डब्यात कोथिंबीर निवडून आणि मुख्य म्हणजे पूर्ण कोरडी करून ठेवा. अशी कोथिंबीर फ्रीजमध्ये १० ते १२ दिवस सुस्थितीत राहते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारBeauty Tipsब्यूटी टिप्स