शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्यासाठी १० बेस्ट पदार्थ, आहारात करा समावेश! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:31 IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात. जसे की, पुरळ, त्वचेसंबंधी रोग, तणाव इत्यादी. अनियमित खाणं आणि जंक फूड आपलं रक्त दूषित करतं. त्यामुळे सतत काहीना काही आजार व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेत असतात. त्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही. काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं.

१) ब्रोकली

ब्रोकली रक्त शुद्ध करण्यासाठी बेस्ट फूड मानलं जातं. याने शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. 

२) लिंबू

रोज लिंबाचा रस गरम पाण्यात मिश्रित करून सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं. यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच याने आपल्या किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं.

३) हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, सोया, इत्यादींमध्ये क्लोरोफिल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. याने रक्त शुद्ध ठेवण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर यातील एन्जाइम्सम लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

४) आलं

आलं सुद्धा नॅच्युरल ब्लड प्यूरिफायर म्हणून काम करतं. आल्याचं सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच नवीन पेशीही तयार होतात. आलं चवीला तिखट असलं तरी थोड्या प्रमाणात कच्च खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

५) गाजर

गाजर खाल्ल्याने रक्त शुद्ध राहतं आणि त्वचेवरही चमक येते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात. याने रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते.

६) ताजी फळे

ताजी फळे जसे की, सफरचंद, आलूबुखारा, पेरू यात फळांमध्ये Pectin Fibre असतं. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच स्ट्रॉबेरी आणि जांभळं सुद्धा लिव्हरला शरीर डीटॉक्स करण्यास मदत करतात.

७) बीट

बिटात नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की, बिटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. 

८) गूळ

गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. याने शरीरातील Clotted Blood ही बाहेर निघतं.

९) हळद

हळद हे फार चांगलं अ‍ॅंटी-बायोटिक मानलं जातं. याचं सेवन केल्याने रक्ताच्या धमण्यांमध्ये सूज येत नाही आणि त्यात चरबीही जमा होत नाही. दुधात हळद टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. त्यामुळे हळदीचा आहारात समावेश करावा.

१०) पाणी

(Image Credit : medicalnewstoday.com)

पाणी सुद्धा एक नॅच्युरल ब्लड प्युरिफायर आहे. आपली किडनी मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्त बाहेर काढते. यात पाण्याची महत्वाची भूमिका असते. आयुर्वेदानुसार, रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य