शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्यासाठी १० बेस्ट पदार्थ, आहारात करा समावेश! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:31 IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध असणं फार गरजेचं आहे. रक्त जर शुद्ध नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या सतत होऊ लागतात. जसे की, पुरळ, त्वचेसंबंधी रोग, तणाव इत्यादी. अनियमित खाणं आणि जंक फूड आपलं रक्त दूषित करतं. त्यामुळे सतत काहीना काही आजार व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेत असतात. त्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही. काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं.

१) ब्रोकली

ब्रोकली रक्त शुद्ध करण्यासाठी बेस्ट फूड मानलं जातं. याने शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. 

२) लिंबू

रोज लिंबाचा रस गरम पाण्यात मिश्रित करून सेवन केल्यानेही रक्त शुद्ध होतं. यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच याने आपल्या किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं.

३) हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, सोया, इत्यादींमध्ये क्लोरोफिल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतात. याने रक्त शुद्ध ठेवण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर यातील एन्जाइम्सम लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

४) आलं

आलं सुद्धा नॅच्युरल ब्लड प्यूरिफायर म्हणून काम करतं. आल्याचं सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच नवीन पेशीही तयार होतात. आलं चवीला तिखट असलं तरी थोड्या प्रमाणात कच्च खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

५) गाजर

गाजर खाल्ल्याने रक्त शुद्ध राहतं आणि त्वचेवरही चमक येते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस सारखे पोषक तत्व असतात. याने रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते.

६) ताजी फळे

ताजी फळे जसे की, सफरचंद, आलूबुखारा, पेरू यात फळांमध्ये Pectin Fibre असतं. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच स्ट्रॉबेरी आणि जांभळं सुद्धा लिव्हरला शरीर डीटॉक्स करण्यास मदत करतात.

७) बीट

बिटात नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं की, बिटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं. 

८) गूळ

गूळ हा रक्त शुद्ध करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय मानला जातो. गुळात असलेलं आयर्न रक्तातील हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. याने शरीरातील Clotted Blood ही बाहेर निघतं.

९) हळद

हळद हे फार चांगलं अ‍ॅंटी-बायोटिक मानलं जातं. याचं सेवन केल्याने रक्ताच्या धमण्यांमध्ये सूज येत नाही आणि त्यात चरबीही जमा होत नाही. दुधात हळद टाकून प्यायल्यास रक्त शुद्ध होतं. त्यामुळे हळदीचा आहारात समावेश करावा.

१०) पाणी

(Image Credit : medicalnewstoday.com)

पाणी सुद्धा एक नॅच्युरल ब्लड प्युरिफायर आहे. आपली किडनी मूत्राद्वारे शरीरातील विषारी पदार्त बाहेर काढते. यात पाण्याची महत्वाची भूमिका असते. आयुर्वेदानुसार, रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य