शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मीठ जास्त खाण्याचे नुकसान माहीत असतीलच, आता कमी खाण्याचे दुष्परिणाम वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 09:49 IST

हेही तितकंच महत्वाचं आहे की, मीठ खूप कमी खाणंही मेंदुसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ रक्तात मिठाचं प्रमाण कमी झाल्याची लक्षणं.

Salt Deficiency in Blood: मिठाशिवाय अनेक पदार्थ बेचव लागतात हे खरंच आहे. पण डॉक्टर नेहमीच मिठाचं सेवन कमी करण्यास सांगतात. वरून मीठ न खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. कारण जास्त मीठ खाल्लं तर हृदयरोग होण्याचा धोका अधिक असते. अशात जास्तीत जास्त लोकांना जास्त मीठ खाण्याचे नुकसान अलिकडे माहीत असतात. पण हेही तितकंच महत्वाचं आहे की, मीठ खूप कमी खाणंही मेंदुसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ रक्तात मिठाचं प्रमाण कमी झाल्याची लक्षणं.

कमी मिठामुळे होऊ शकतं नुकसान

मिठाच्या जास्त सेवनाने अनेक आजारांचा धोका असतो. हाय ब्लड प्रेशरचं हे एक फार मोठं कारण असतं. आहारातून मीठ खूप कमी करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे असं अजिबात करू नका.

रक्तात कमी होईल मीठ

मिठामध्ये सोडिअम आणि क्लोराइड असतं. हे दोन्ही इलेक्ट्रोलाइट असतात जे अनेक कामे करतात. मीठ न खाल्ल्याने किंवा खूप कमी खाल्ल्याने रक्तात सोडिअमची लेव्हल कमी होते जी नुकसानकारक ठरू शकते.

सोडिअम कमी झालं तर होतो आजार

नॅशनल किडनी फाउंडेशनने सांगितलं की, जेव्हा रक्तात सोडिअमची लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होते तेव्हा त्या स्थितीला हायपोनेट्रिमिया म्हणतात. या आजारामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं.

पाणी बॅलन्स ठेवतं सोडिअम

सोडिअममुळे शरीरात फ्लूइडची लेव्हल बॅलन्स राहते. सोडिअम कमी झालं तर फ्यूइडची लेव्हल वाढते आणि सेल्समध्ये सूज येते. याचा मेंदुला खूप धोका होऊ शकतो. 

हायपोनेट्रिमियाची 8 लक्षण

मळमळ होणे, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये कमजोरी, लो ब्लड प्रेशर, उभे राहिल्यावर चक्कर येणे, एनर्जी कमी होणे आणि थकवा जाणवणे, भूक न लागणे, अस्वस्थता किंवा राग येणे.

नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, सोडिअमच्या कमतरतेचे काही संकेत खूप घातक असू शकतात. हे दिसल्यावर लगेच डॉक्टरांना भेटा. यात कन्फ्यूजन होणे, भ्रम होणे, बेशुद्ध पडणे, झटके येणं किंवा कोमात जाणे यांचा समावेश आहे.

जर मिठाचं सेवन कमी केल्याने सोडिअमची कमतरता झाली तर याचा उपचार बॅलन्समध्ये लपला आहे. जास्त मीठ खाणंही घातक आहे आणि कमी मीठ खाणंही नुकसानकारक आहे. डब्ल्यूएचओनुसार, एका दिवसात 5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य