शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या 'कुलुक्की सरबत'; उन्हाच्या काहिलीवर सर्वोत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:39 IST

उन्हाळ्याच्या काहिलीवर उतारा म्हणून सरबतांना सर्वात जास्त पसंती दिली जाते. मात्र तुम्ही पिता ते सरबत तुमच्या आरोग्याला किती पोषक आहे, याबद्दल तुम्हाला माहिती असते का? तुम्ही केरळच्या कुलुक्की सरबताबद्दल ऐकल आहे का ? फक्त थंडावाच नाही तर हे सरबत कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे.

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक काढे पितो. बरेचदा हे काढे पिताना नाक मुरडले जाते. त्यातही वाढत्या उन्हाच्या काहिलीत गरमागरम काढे पिणार कोण? त्यामुळेच आम्ही एक थंडगार पर्याय तुमच्यासाठी आणला आहे. तो म्हणजे केरळचं प्रसिद्ध कुलुक्की सरबत. या सरबताचे फायदे अगणित आहेत. हे सरबत कसे बनवायचे याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

कसं बनवावं कुलुक्की सरबत?

साहित्य :चिया सीड्स :अर्धा चमचानारळ पाणी :४ कपगुळाची पावडर : पाव चमचालिंबू १मीठ चवीनुसारमिरची १आलं चवीनुसारपुदीन्याची ८, १० पानबर्फ

कृती:

सरबत बनवण्याआधी १५ ते २० मिनिटे चिया सीड्स पाण्यात भिजवून ठेवावेत.त्यानंत नारळाचे पाणी घ्यावं व त्यात लिंबाचा रस मिसळावा.त्यानंतर त्यात गुळ, मीठ आणि चिया सीड्स घालाव्यात.हिरवी मिरची कापून घालावी. आवडत असेल तर आलंही घाला. आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल.बर्फाचे तुकडे आणि वरून पुदीन्याची पान घालून सर्व्ह करा.

आहे ना झटपट आणि रुचकर? चला आता याचे फायदे जाणून घेऊयात

शरीराला थंडावा मिळतो - उन्हाळ्यात आपण वारंवार थंड पाणी पितो. हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्याऐवजी कुलुक्की सरबत प्या. यातील नारळ पाणी तुमच्या शरीराला थंडावा देतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते- या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेच आहे. त्यावर हे सरबत म्हणजे अत्यंत उत्तम उपाय आहे. यात लिंबू असल्याने व्हिटॅमीन सी असतेच तसंच नारळपाण्याचे असंख्य फायदे आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

पोषक तत्वांनी युक्त- कुलुक्की सरबत चिया सीड्स, लिंबू, नारळ पाणी आणि गुळापासून बनते. चिया सीड्स प्रोटीनयुक्त असतात, त्यात कॅल्शियम, ओमेगा-3, मॅग्नीशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स असतात. नारळ पाण्यात फायबर असते. त्याचबरोबर पोटॅशिअम असते. गुळात अनेक व्हिटॅमिन्स सोबतच कॅलशिअम असतं.

हाडे मजबूत होतात- या सरबतामध्ये पुरेपुर कॅल्शियम असते त्यामुळे हाडं मजबूत होतात. ज्यांना घुडग्याचं दुखणं असेल त्यांनी तर हे सरबत नक्की प्यावे. 

पोटाच्या समस्या दूर होतात- सध्या पोटाचे विकार वाढू लागले आहेत. अपचन, पित्त, गॅस अशा समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये जाणवतात. या सरबतात फायबर अनेक व्हिटॅमिन्स असल्याने पोटविकारांवर हे सरबत फायद्याचे ठरते.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न