शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

परीक्षेपूर्वी 'ही' गोष्ट नक्की करा, कठिणातली कठीण पेपरमध्येही व्हाल पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:44 IST

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं.

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. जास्त गुण मिळवण्याच्या हट्टापायीच मुलांवर अभ्यासाचा अधिक ताण येतो.

एवढंच नाही तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्याच्या इच्छेमुळे काही मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे, परीक्षेत नापास झाल्यास काही मुलं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात.  

परीक्षेच्या काळात दिवसरात्र जागं राहून कित्येक मुलं अभ्यास करतात. पालकही आपल्या मुलांना जमेल तशी आणि तेवढी मदत करतात. पण खरंतर एवढी ओढाताण करुन अभ्यास करण्याची खरंच गरज नाहीय. वेळच्या वेळी प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यास रात्रीचे जागरण करावेच लागणार नाही. शिवाय, अभ्यासाची उजळणी होण्यासही मदत होईल. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होणार नाही. 

आपल्या मुलांनी ताणतणाव न घेता परीक्षेत पास व्हावं,अशी इच्छा असल्यास त्यांना परीक्षेच्या काळात रात्रीची पुरेशी झोप घ्यायला सांगा. आरोग्य निरोगी राहण्यासाठी झोपदेखील तितकीच महत्त्वाची आहे. परीक्षेच्या काळात जागरण न करता पुरेशा प्रमाणात झोप झाल्यास मुलांच्या गुणांमध्ये सुधारणा होते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.  

अमेरिकेच्या बायलर विश्वविद्यालयातील संशोधकांनी, विद्यार्थ्यांना '8 तासांची कसोटी' या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामध्ये त्यांना परीक्षेच्या आठवड्यात कमीतकमी आठ तासांची झोप पूर्ण केल्यावर काही गुण देण्यात आले. ज्या मुलांनी हे आव्हान पार पाडलं, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले, असं निरीक्षण संशोधनाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले. 

बायलर विश्वविद्यालयातील मायकल स्कुलिन यांनी सांगितले की, योग्य प्रमाणात झोप घेतल्यानं परीक्षेत नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. परीक्षेच्या काळात एकतर अभ्यासाशी तडजोड करावी किंवा झोपेशी, असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु  संशोधनातून विद्यार्थ्यांच्या विचारानुसार अगदी विरुद्ध गोष्टी सिद्ध झाल्या.  

विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रो.एलिस किंग यांनी सांगितले की, रात्रीचं जागरण करुन शाळेनं दिलेला अभ्यास पूर्ण करणं ही बाब योग्य नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना असते. पण, जागरणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही, असा गैरसमज मुलं करुन रात्रीची पुरेशी झोप घेत नाही. पण वेळेच्या वेळी दिलेला गृहपाठ केल्यास रात्रीचे जागरण करण्याची समस्या निर्माणच होणार नाही, ही गोष्ट समजल्यास विद्यार्थीवर्ग अभ्यासात नक्कीच चांगले गुण प्राप्त करू शकेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यrelationshipरिलेशनशिपStudentविद्यार्थीexamपरीक्षा