शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परीक्षेपूर्वी 'ही' गोष्ट नक्की करा, कठिणातली कठीण पेपरमध्येही व्हाल पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:44 IST

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं.

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. जास्त गुण मिळवण्याच्या हट्टापायीच मुलांवर अभ्यासाचा अधिक ताण येतो.

एवढंच नाही तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्याच्या इच्छेमुळे काही मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे, परीक्षेत नापास झाल्यास काही मुलं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात.  

परीक्षेच्या काळात दिवसरात्र जागं राहून कित्येक मुलं अभ्यास करतात. पालकही आपल्या मुलांना जमेल तशी आणि तेवढी मदत करतात. पण खरंतर एवढी ओढाताण करुन अभ्यास करण्याची खरंच गरज नाहीय. वेळच्या वेळी प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यास रात्रीचे जागरण करावेच लागणार नाही. शिवाय, अभ्यासाची उजळणी होण्यासही मदत होईल. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होणार नाही. 

आपल्या मुलांनी ताणतणाव न घेता परीक्षेत पास व्हावं,अशी इच्छा असल्यास त्यांना परीक्षेच्या काळात रात्रीची पुरेशी झोप घ्यायला सांगा. आरोग्य निरोगी राहण्यासाठी झोपदेखील तितकीच महत्त्वाची आहे. परीक्षेच्या काळात जागरण न करता पुरेशा प्रमाणात झोप झाल्यास मुलांच्या गुणांमध्ये सुधारणा होते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.  

अमेरिकेच्या बायलर विश्वविद्यालयातील संशोधकांनी, विद्यार्थ्यांना '8 तासांची कसोटी' या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामध्ये त्यांना परीक्षेच्या आठवड्यात कमीतकमी आठ तासांची झोप पूर्ण केल्यावर काही गुण देण्यात आले. ज्या मुलांनी हे आव्हान पार पाडलं, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले, असं निरीक्षण संशोधनाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले. 

बायलर विश्वविद्यालयातील मायकल स्कुलिन यांनी सांगितले की, योग्य प्रमाणात झोप घेतल्यानं परीक्षेत नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. परीक्षेच्या काळात एकतर अभ्यासाशी तडजोड करावी किंवा झोपेशी, असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु  संशोधनातून विद्यार्थ्यांच्या विचारानुसार अगदी विरुद्ध गोष्टी सिद्ध झाल्या.  

विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रो.एलिस किंग यांनी सांगितले की, रात्रीचं जागरण करुन शाळेनं दिलेला अभ्यास पूर्ण करणं ही बाब योग्य नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना असते. पण, जागरणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही, असा गैरसमज मुलं करुन रात्रीची पुरेशी झोप घेत नाही. पण वेळेच्या वेळी दिलेला गृहपाठ केल्यास रात्रीचे जागरण करण्याची समस्या निर्माणच होणार नाही, ही गोष्ट समजल्यास विद्यार्थीवर्ग अभ्यासात नक्कीच चांगले गुण प्राप्त करू शकेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यrelationshipरिलेशनशिपStudentविद्यार्थीexamपरीक्षा