शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपूर्वी 'ही' गोष्ट नक्की करा, कठिणातली कठीण पेपरमध्येही व्हाल पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:44 IST

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं.

परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. जास्त गुण मिळवण्याच्या हट्टापायीच मुलांवर अभ्यासाचा अधिक ताण येतो.

एवढंच नाही तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्याच्या इच्छेमुळे काही मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे, परीक्षेत नापास झाल्यास काही मुलं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात.  

परीक्षेच्या काळात दिवसरात्र जागं राहून कित्येक मुलं अभ्यास करतात. पालकही आपल्या मुलांना जमेल तशी आणि तेवढी मदत करतात. पण खरंतर एवढी ओढाताण करुन अभ्यास करण्याची खरंच गरज नाहीय. वेळच्या वेळी प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यास रात्रीचे जागरण करावेच लागणार नाही. शिवाय, अभ्यासाची उजळणी होण्यासही मदत होईल. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होणार नाही. 

आपल्या मुलांनी ताणतणाव न घेता परीक्षेत पास व्हावं,अशी इच्छा असल्यास त्यांना परीक्षेच्या काळात रात्रीची पुरेशी झोप घ्यायला सांगा. आरोग्य निरोगी राहण्यासाठी झोपदेखील तितकीच महत्त्वाची आहे. परीक्षेच्या काळात जागरण न करता पुरेशा प्रमाणात झोप झाल्यास मुलांच्या गुणांमध्ये सुधारणा होते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.  

अमेरिकेच्या बायलर विश्वविद्यालयातील संशोधकांनी, विद्यार्थ्यांना '8 तासांची कसोटी' या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामध्ये त्यांना परीक्षेच्या आठवड्यात कमीतकमी आठ तासांची झोप पूर्ण केल्यावर काही गुण देण्यात आले. ज्या मुलांनी हे आव्हान पार पाडलं, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले, असं निरीक्षण संशोधनाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले. 

बायलर विश्वविद्यालयातील मायकल स्कुलिन यांनी सांगितले की, योग्य प्रमाणात झोप घेतल्यानं परीक्षेत नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. परीक्षेच्या काळात एकतर अभ्यासाशी तडजोड करावी किंवा झोपेशी, असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु  संशोधनातून विद्यार्थ्यांच्या विचारानुसार अगदी विरुद्ध गोष्टी सिद्ध झाल्या.  

विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रो.एलिस किंग यांनी सांगितले की, रात्रीचं जागरण करुन शाळेनं दिलेला अभ्यास पूर्ण करणं ही बाब योग्य नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना असते. पण, जागरणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही, असा गैरसमज मुलं करुन रात्रीची पुरेशी झोप घेत नाही. पण वेळेच्या वेळी दिलेला गृहपाठ केल्यास रात्रीचे जागरण करण्याची समस्या निर्माणच होणार नाही, ही गोष्ट समजल्यास विद्यार्थीवर्ग अभ्यासात नक्कीच चांगले गुण प्राप्त करू शकेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यrelationshipरिलेशनशिपStudentविद्यार्थीexamपरीक्षा