शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जास्त घाबरणं आणि भीती वाटणं 'या' गंभीर आजाराचं लक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 11:09 IST

सामान्यपणे होणारी घबराहट आणि भीती हे अनेकांनी अनुभवलं असेल. पण हीच घाबरणं सामान्यपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पॅनिक डिसऑर्डरची समस्या असल्याचा धोका आहे.

सामान्यपणे होणारी घाबरणं आणि भीती वाटणं हे अनेकांनी अनुभवलं असेल. पण हेच घाबरणं सामान्यपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पॅनिक डिसऑर्डरची समस्या असल्याचा धोका आहे. पॅनिक डिसऑर्डर सामान्यपणे घाबरणं आणि भीती वाटणं यापेक्षा वेगळी समस्या आहे. पॅनिक डिसऑर्डर मुळात एंग्जायटी डिसऑर्डरचाच एक प्रकार आहे. या आजाराला एंग्जायटी डिस्ऑर्डरची अंतिम लेव्हल मानली जाऊ शकते. जे लोक खूप जास्त काम करतात किंवा आपल्या कामाने खूश नसतात आणि तरुणांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात होतो. कोणत्या ना कोणत्या इतर समस्या त्यांना झालेली असते. मग अशात याप्रकारचा विकार झाला तर व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींबाबत घाबरु लागतात. इतकेच नाही तर या लोकांना एकटे राहण्याचीही भीती वाटते. 

पॅनिक डिस्ऑर्डरची लक्षणे

- छोट्या छोट्या गोष्टींची अचानक भीती वाटणे.

- अचानक हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, जास्त घाम येणे, हात आणि पाय सुन्न होणे या समस्या दिसतात.

- याप्रकारच्या मानसिक विकारामुळे व्यक्तीच्या व्यवहारात मोठा बदल होतो. सोबतच त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो. 

- श्वास घेण्यास त्रास होणे.

- हृदय आणि छातीत वेदना होणे.

- श्वास भरुन येणे

- पोटात दुखणे आणि थकवा जाणवणे.

काय आहे कारणे?

आनुवांशिकता

अशाप्रकारचा विकार परिवारातील एखाद्या व्यक्ती आधी असेल तर तो पुढच्या पिढ्यांनाही होतो. हा विकार कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकारा इतकाच गंभीर आहे. 

मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल

मेंदूमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलामुळे याप्रकारचा विकार होणे स्वाभाविक आहे. याच कारणाने मानसिक विकार उत्पन्न होतात.

कोणत्याही प्रकारची सवय

अनेकदा तरुणांना औषधे आणि अल्कोहोलची फार जास्त सवय लागल्यानेही पॅनिक अटॅक होऊ लागतो. याकडे आपण औषधांचे आणि अल्कोहोलचे साइड इफेक्ट म्हणूनही पाहू शकतो. बदलत्या लाइफस्टाइलमुळे तरुणाई अल्कोहोलच्या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे त्यांना याचा अधिक धोका आहे. 

तणाव

अनेकदा व्यक्ती आपल्या कामाने, परिवारामुळे किंवा इतरही कोणत्या कारणाने तणावग्रस्त होऊ लागतो. यामुळेही पॅनिक डिस्ऑर्डर होण्याचा धोका असतो. जास्त तणाव असणेही व्यक्तीचा मानसिक विकार दर्शवतो. आज बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना तणावाचा मोठा सामना करावा लागतो आहे. खासकरुन तरुणांना याचा जास्त फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना या विकाराचा अधिक धोका संभवतो.

उपचार

या विकाराचा उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ पीडित व्यक्तीसोबत बोलतो, त्याच्या जीवनाबाबत जाणून घेतात आणि नंतर त्यानुसार उपचार करतात. कॉगनिटीव्ह बिहेविअरल थेरपीच्या मदतीनेही याचा उपचार केला जातो. यातून पीडित व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा एखादा मानसिक विकार थेरपीच्या माध्यमातून बरा होत नाही. तेव्हा डॉक्टर औषधांच्या मदतीने यावर उपचार करतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य