शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लठ्ठपणा आजारासाठी निमंत्रण, काय काळजी  घ्याल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 11:53 IST

लठ्ठपणामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या केव्हा इतक्या अडचणीच्या ठरतात कि, तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा म्हटलं कि, आपल्या डोळ्यासमोर तत्काळ जाडजूड व्यक्तीची प्रतिमा येते. सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाले तर लठ्ठपणा हा बहुतांश आजारांचा पाया असतो. आजराचा राजा म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आपसूचकच निमंत्रण दिले जाते. हा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दैनंदिन आयुष्यात काही बदल करावेसे लागतात. काही जण अपयशी होतात तर काही यशस्वी होतात. मात्र हे बदल केले नाही तर आरोग्याच्या मोठ्या समस्यांचा आपल्या सामना करावा लागतो. 

लठ्ठपणामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या केव्हा इतक्या अडचणीच्या ठरतात कि, तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य वेळीच लठ्ठपणा दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लठ्ठपणामुळे आपल्याला  मधुमेह ( डायबेटिज ), रक्तदाब (ब्लड प्रेशर)  संयुक्त वेदना (जॉइंट पेन) विशेष म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग (कॅन्सर) शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे होतात. मानवी शरीराच्या अनेक भागांत चरबी वाढत असते. या चरबीचा शरीरातील मुख्य अवयवांवर परिणाम हाेताे.

लठ्ठपणा वाढण्याची दोन प्रमुख कारणेलठ्ठपणा हा आनुवंशिक असू शकतो. घरातील सदस्यांना लठ्ठपणा असेल तर त्यामुळेसुद्धा अनेकवेळा त्या व्यक्ती लठ्ठ होत असतात. बाह्यकारणांमुळे लठ्ठपणा वाढीस लागत असतो. यामध्ये तळलेले, जास्त कॅलरी असलेले खाद्यपदार्थ खाणे, तसेच अनेकवेळा बैठ्या स्वरूपाचे काम करणे. शारीरिक हालचाल फार कमी प्रमाणात करणे. फास्ट आणि जंक फूड  खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी प्रमाणापेक्षा अधिक वाढते.

 काय काळजी  घ्याल ?  संतुलित आहार घेणे.  फळभाज्या आहारात ठेवा.    सकाळचा नाश्ता करताना मोड आलेले कडधान्य खा.  पुरेसा व्यायाम केला पाहिजे.   शारीरिक हालचाल गरजेची. लहान मुलांना घराबाहेरचे खेळ खेळण्यास प्रवृत्त करा. जंक फूड खाणे टाळावे.

 बॅाडी मास इंडेक्स  म्हणजे काय ?   आपल्या शरीरातील वजन नियंत्रणात आहे की, नाही यासाठी  बॅाडी मास इंडेक्स (बीएमआय ) मोजला जातो. यामध्ये शरीराची उंची आणि वजनाचं गुणोत्तर याला बीएमआय मोजणे असे म्हणतात.  बीएमआयमुळे शरीराचं वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की, नाही याची आपल्याला माहिती मिळते. विशेष म्हणजे आपल्या दिशा मिळते.    साधारणपणे १८.५ ते २४.५ च्या दरम्यान बीएमआय असावा. त्यापेक्षा २५ पेक्षा अधिक असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर बीएमआय ३० पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणाची सुरुवात आहे. त्यांनी त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.

शरीराचे वजन नियंत्रण केवळ लठ्ठ व्यक्तींनीच नाही तर सर्वसाधारण व्यक्तींनीसुद्धा आपले वजन आटोक्यात कशा पद्धतीने राहिल, यासाठी सतर्क असले पाहिजे. कारण एकदा का लठ्ठपणा वाढला की, अनेक आजार तुम्हला होत असतात. आपल्याकडे शहरी भागातही लठ्ठपणाच्या व्यक्ती आढळतात, असे नाही तर आता ग्रामीण भागातसुद्धा लठ्ठ व्यक्ती आढळून आल्यात. त्यापैकी काही जणांना शस्त्रक्रियांचीसुद्धा गरज लागलेली आहे. आम्ही लठ्ठ व्यक्तींवर शस्त्रक्रिया तेव्हाच करतो, जेव्हा त्या व्यक्तीने लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्व उपाय केले आहेत आणि त्या लठ्ठपणामुळे त्या व्यक्तींच्या आरोग्याला धोका आहे. आमच्याकडे सर्वांच्या शस्त्रक्रिया आम्ही करत नाही. त्याला सर्व आधीचे उपाय सुचविले जातात. ती व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी पात्र आहे का ? याची चाचपणी केली जाते. डॉ. संजय बोरुडे,बेरियाट्रिक सर्जन, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स