शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:40 IST

जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात. 

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात. 

हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे आणि तुमच्या आजूबाजूला असे बरेच लोक असतील जे या आजाराचे बळी ठरले असतील. जेव्हा तुम्हाला या आजाराची माहिती मिळेल तेव्हा तुम्ही हैराण व्हाल. या आजाराला नोमोफोबिया असं म्हणतात, म्हणजेच फोन नसण्याची भीती. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना नेहमी भीती वाटते की ते कदाचित त्यांच्या फोनपासून दूर जातील किंवा त्यांचा फोन चोरीला जाईल. फोनची बॅटरी लो होण्याची भीती आहे. यासोबतच अनेकदा त्यांचा फोन तुटण्याची भीती असते. ही एक प्रकारची चिंता आहे जी लोकांना फोनच्या संदर्भात नेहमीच वाटत असते.

फोन हरवण्याची भीती

हा एक दुर्मिळ आजार मानला जात असला तरी आजच्या काळात हा एक अतिशय सामान्य आजार झाला आहे. ज्यांना फोनचं व्यसन आहे त्यांच्या बाबतीत हे जास्त घडतं. द रिकव्हरी व्हिलेज वेबसाइटनुसार, अनेक मुला-मुलींवर एक रिसर्च करण्यात आला, ज्यामध्ये असं आढळून आलं की २३ टक्के विद्यार्थी नोमोफोबिक आहेत. त्यापैकी ७७ टक्के विद्यार्थी दिवसातून ३५ वेळा त्यांचा फोन पाहतात.

लक्षणं काय आहेत?

नोमोफोबियाच्या लक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास, फोनवर वारंवार नोटिफिकेशन पाहणं आणि फोन स्विच ऑफ न करणं यांचा समावेश होतो. सर्व ठिकाणी तुम्ही तुमचा फोन सोबत घेऊन जाणं. पूर्ण चार्ज झाल्यानंतरही फोन पुन्हा पुन्हा चार्ज करणं. तुमच्याकडे फोन आहे की नाही हे पुन्हा पुन्हा तपासणं. आपलं काहीतरी वाईट होईल आणि आपण कोणालाही कॉल करू शकणार नाही याची काळजी वाटणं. वाय-फाय किंवा नेटवर्कशिवाय राहण्याची भीती वाटणं. फोन हरवण्याची भीती वाटणं. या आजारावर औषधांसह अनेक प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स