शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:40 IST

जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात. 

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात. 

हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे आणि तुमच्या आजूबाजूला असे बरेच लोक असतील जे या आजाराचे बळी ठरले असतील. जेव्हा तुम्हाला या आजाराची माहिती मिळेल तेव्हा तुम्ही हैराण व्हाल. या आजाराला नोमोफोबिया असं म्हणतात, म्हणजेच फोन नसण्याची भीती. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना नेहमी भीती वाटते की ते कदाचित त्यांच्या फोनपासून दूर जातील किंवा त्यांचा फोन चोरीला जाईल. फोनची बॅटरी लो होण्याची भीती आहे. यासोबतच अनेकदा त्यांचा फोन तुटण्याची भीती असते. ही एक प्रकारची चिंता आहे जी लोकांना फोनच्या संदर्भात नेहमीच वाटत असते.

फोन हरवण्याची भीती

हा एक दुर्मिळ आजार मानला जात असला तरी आजच्या काळात हा एक अतिशय सामान्य आजार झाला आहे. ज्यांना फोनचं व्यसन आहे त्यांच्या बाबतीत हे जास्त घडतं. द रिकव्हरी व्हिलेज वेबसाइटनुसार, अनेक मुला-मुलींवर एक रिसर्च करण्यात आला, ज्यामध्ये असं आढळून आलं की २३ टक्के विद्यार्थी नोमोफोबिक आहेत. त्यापैकी ७७ टक्के विद्यार्थी दिवसातून ३५ वेळा त्यांचा फोन पाहतात.

लक्षणं काय आहेत?

नोमोफोबियाच्या लक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास, फोनवर वारंवार नोटिफिकेशन पाहणं आणि फोन स्विच ऑफ न करणं यांचा समावेश होतो. सर्व ठिकाणी तुम्ही तुमचा फोन सोबत घेऊन जाणं. पूर्ण चार्ज झाल्यानंतरही फोन पुन्हा पुन्हा चार्ज करणं. तुमच्याकडे फोन आहे की नाही हे पुन्हा पुन्हा तपासणं. आपलं काहीतरी वाईट होईल आणि आपण कोणालाही कॉल करू शकणार नाही याची काळजी वाटणं. वाय-फाय किंवा नेटवर्कशिवाय राहण्याची भीती वाटणं. फोन हरवण्याची भीती वाटणं. या आजारावर औषधांसह अनेक प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स