शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मल्टी टास्किंग काळाची गरज; पण आरोग्यासाठी धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:04 PM

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात.

(Image credit : Be Brain Fit)

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मल्टी टास्किंग तसं पाहायला गेलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. सध्या मल्टी टास्किंग स्टाफची मागणीही वाढत आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी प्रत्येक कंपनी आटापिटा करत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक लोक आपल्या लाइफमध्ये मल्टी टास्किंग होऊ लागले आहेत. परंतु या सर्व गोष्टींमुळे मल्टी टास्किंग व्यक्तींच्या आरोग्यावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. जाणून घेऊया मल्टी टास्किंग असल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत...

मेंदूवर होतो परिणाम

काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांवरून मीडिया मल्टी टास्कर्सच्या डोक्यामध्ये हळूहळू ग्रे मॅटर कमी होत जातं. त्यामुळे बौद्धिक नियंत्रण क्षमता, भावनांवरील पकड आणि इच्छा शक्ती कमजोर होऊ लागते. 

स्मरणशक्ती कमजोर होते

2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून एक गोष्ट समोर आली की, क्रॉनिक मीडिया मल्टीटास्कर्सची वर्किंग मेमरी म्हणजेच एखाद्या कामादरम्यान संबंधित माहीती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि लॉन्ग-टर्म मेमरी म्हणजेच घटना आणि माहिती बराच वेळ लक्षात ठेवण्याची क्षमता कमजोर होते. 

आभास होण्याची समस्या

एका संशोधनानुसार, संशोधकांनी सात दिवसांपर्यंत मल्टी टास्किंग करणाऱ्या काही लोकांच्या घरी राहून त्यांचं निरिक्षण केलं, त्यांना असं दिसून आलं की, एखादी व्यक्ती जितकी जास्त मल्टीटास्किंग करते तेवढीचं तिच्या मनस्थितीमध्ये फरक दिसून येतो. एका मर्यादेनंतर त्यांच्या आभासमध्ये वाढ होते आणि त्यांना आवश्यक कामांसोबतच अनावश्यक कामांमधील फरक ओळखू शकत नाहीत. याशिवाय एक काम करताना मध्येच दुसरं काम करणं, विसरणं, चुका करणं यांसारख्या चुका करू लागतात. 

मल्टी टास्किंगमुळे होऊ शकतात दुर्घटना

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मागील काही दिवसांमध्ये जेव्हा न्यूयॉर्क शहरामध्ये जवळपास 1400 पायी चालणाऱ्या लोकांचा कार अॅक्सिडंट झाल्याची कारणं तपासण्यात आली त्यामागेही मल्टीटास्किंगचीच क्रेझ असल्याचे सिद्ध झाले. त्यातून असं समजलं की, 10 टक्के व्यक्तींच्या तुलनेमध्ये 20 टक्के तरूण मुलं पायी चालत असूनही दुर्घटनेची शिकार झाली होती. कारण त्यांचं संपूर्ण लक्ष मोबाइलमध्येच होतं. त्यामुळे पडणं, फ्रॅक्चर होणं यांसारख्या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या होत्या. 

पार्टनर आणि परिवाराच्या संबंधांवर परिणाम

एका साधारण समजानुसार, स्मार्टफोनमुळे नात्यांमधील , व्यक्तींमधील अंतर फार कमी झालं आहे. परंतु यामागे लपलेलं एक सत्य या संशोधनामधून समोर आलं. ज्यामध्ये दिलेल्या आकड्यांनुसार, हे स्पष्ट झालं की, स्मार्टफोनमुळे संबंध सुधारण्याऐवजी बिघडत आहेत. संशोधनाच्या भाषेमध्ये या समस्यांना टेक्नोफ्रेंकेस असं नाव देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स