शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

...म्हणून जेवणानंतर आंघोळ करणं ठरतं नुकसानदायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 14:47 IST

सध्या वातावरणामध्ये गारवा वाढत चालला आहे. पहाटे पडणाऱ्या गुलाबी थंडीत सकाळी उठणं अशक्य होतं. अशातच लवकर झोपेतून उठण्याचा प्रयत्न केलाच तर मात्र या थंड वातावरणात आंघोळ करणं अशक्य होतं.

(Image Creadit : top.mn)

सध्या वातावरणामध्ये गारवा वाढत चालला आहे. पहाटे पडणाऱ्या गुलाबी थंडीत सकाळी उठणं अशक्य होतं. अशातच लवकर झोपेतून उठण्याचा प्रयत्न केलाच तर मात्र या थंड वातावरणात आंघोळ करणं अशक्य होतं. अनेक लोकं गारव्यामध्ये एकदम गरम पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक दुपारी जेवण झाल्यानंतर आंघोळ करतात. परंतु असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. जाणून घेऊयात जेवणानंतर आंघोळ केल्यामुळे शरीराला होणाऱ्या अपायांबाबत... 

शरीराचे नियम :

आपल्या शरीराचेही काही नियम असतात. त्यानुसार जर आरोग्य राखलं तर त्याचे शरीरावर विपरित परिणाम होत नाहीत. परंतु त्याविरूद्ध केलेली कामं शरीरासाठी नुकसानदायक ठरतात. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. परंतु फक्त एवढचं पुरेसं नसतं. जसं आपलं वेळेवर जेवणं आणि त्याचं व्यवस्थित पचन होणं जसं शरीरासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेवणानंतर आपण आपल्या नकळत अशी काही कामं करतो जे आपलं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

जेवणानंतर आंघोळ करणं टाळा :

जेवणानंतर लगेच आंघोळ करणं टाळा. असं करणं शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतं. जर जेवल्यानंतर तुम्ही आंघोळ करत असाल तर पोटातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे पचनक्रियेवर परिमाण होतो. परिणामी शरीर अस्वस्थ होतं. 

या गोष्टींपासूनही दूर रहा :

सिगारेट :

जर तुम्ही जेवणानंतर सिगरेट घेत असाल तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. 

फळांचं सेवन करणं टाळा :

अनेक लोकं जेवणानंतर लगेच फळं खातात. फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं असलं तरीही जेवणानंतर लगेचचं फळं खाणं टाळा. जर जेवल्यानंतर लगेच फळं खाल्ली तर त्याचा योग्य लाभ शरीराला मिळत नाही. उलट त्याचे अनेक तोटे होतात. त्यामुळे जेवणानंतर कमीतकमी एक तासानंतर फळांचं सेवन करावं. 

चहा :

चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅसिडिक पदार्थ असतात. जर तुम्ही जेवणानंतर लगेचच चहाचं सेवन करत असाल तर त्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे जेवणं पचण्यास व्यत्यय येतो. जेवणानंतर जवळपास 2 तासांनी चहाचं सेवन करू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य