शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बापरे! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय थॅलेसीमिया आजार; 70% बाधित मुलांना नाही मिळत डोनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:26 IST

Thalassemia : शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो.

नवी दिल्ली - देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलेसीमिया (Thalassemia) हा आजार होतो. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो. जी मुलं या आजाराचा सामना करतात. त्यांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, हा एक जेनेटिक आजार (Genetic Disease) आहे. याचा अर्थ आई वडिलांकडून हा आजार मुलांमध्ये पसरतो. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराचे लक्षणे दिसून येतात थॅलेसिमिया बाधित असणाऱ्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मिती देखील होत नाही. या कारणांमुळे या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. 

आजारपणात आरबीसी (RBC) फक्त 10 ते 25 दिवसापर्यंत शरीरामध्ये टिकतात. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी जिवंत राहतात म्हणूनच या आजाराने त्रस्त असणाऱ्या मुलांना 20 ते 25 दिवसानंतर रक्त चढवावे लागते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील पीडियाट्रिक हिमटोलॉजी विभागाचे डॉ. गौरव खारया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक वर्षी असे 10 हजार नवीन घटना समोर येतात. यापेक्षा 3 पटीने जास्त रुग्ण सिकल सेलचे दिसून येतात. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रान्सफ्यूजन आणि आयरन चिलेशनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एक मात्र उपचार आहे परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंकिल डोनर सहज उपलब्ध होतात यामुळे रुग्णांचे ट्रान्सप्लांट होत नाही. ट्रान्सप्लांट न झाल्यामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते व रुग्णाला नेहमी शरीरात रक्त चढवावे लागते. 

वारंवार शरीरामध्ये रक्त चढवल्यास रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील दिसून येतात. बाल रोग विशेषज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांच्या मते, थॅलेसीमिया असे दोन प्रकार असतात.एक सौम्य असतो आणि एक भयंकर तीव्र प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सौम्य थॅलेसीमियाच्या प्रकारांमध्ये लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु तीव्र थॅलेसीमिया मध्ये मुलाला प्रत्येक 20 ते 25 दिवसांनंतर एक युनिट रक्त चढवावे लागते. वारंवार रक्त चढवल्याने अनेकदा शरीरामध्ये आयरन सुद्धा वाढून जाते त्यामुळे अन्य आजार होण्याची शक्यता असते. तीव्र थॅलेसेमीया बाधित असणाऱ्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी डोनर सहज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे अनेक मुलं आयुष्यभर या आजाराला सामोरे जात असतात. डॉ. प्रदीप यांच्या मते, जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर अशा वेळी संपूर्ण चाचणी करायला पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला कळून येईल की, आपल्याला कोण कोणते आजार आहेत किंवा नाही. 

थॅलेसीमियाची लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे

नेहमी अशक्तपणा जाणवतो.नखं, डोळे आणि जिभेवर पिवळा थर जमा होणे. मुलांची वाढ न होणे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स