शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बापरे! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय थॅलेसीमिया आजार; 70% बाधित मुलांना नाही मिळत डोनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:26 IST

Thalassemia : शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो.

नवी दिल्ली - देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलेसीमिया (Thalassemia) हा आजार होतो. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो. जी मुलं या आजाराचा सामना करतात. त्यांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, हा एक जेनेटिक आजार (Genetic Disease) आहे. याचा अर्थ आई वडिलांकडून हा आजार मुलांमध्ये पसरतो. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराचे लक्षणे दिसून येतात थॅलेसिमिया बाधित असणाऱ्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मिती देखील होत नाही. या कारणांमुळे या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. 

आजारपणात आरबीसी (RBC) फक्त 10 ते 25 दिवसापर्यंत शरीरामध्ये टिकतात. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी जिवंत राहतात म्हणूनच या आजाराने त्रस्त असणाऱ्या मुलांना 20 ते 25 दिवसानंतर रक्त चढवावे लागते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील पीडियाट्रिक हिमटोलॉजी विभागाचे डॉ. गौरव खारया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक वर्षी असे 10 हजार नवीन घटना समोर येतात. यापेक्षा 3 पटीने जास्त रुग्ण सिकल सेलचे दिसून येतात. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रान्सफ्यूजन आणि आयरन चिलेशनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एक मात्र उपचार आहे परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंकिल डोनर सहज उपलब्ध होतात यामुळे रुग्णांचे ट्रान्सप्लांट होत नाही. ट्रान्सप्लांट न झाल्यामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते व रुग्णाला नेहमी शरीरात रक्त चढवावे लागते. 

वारंवार शरीरामध्ये रक्त चढवल्यास रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील दिसून येतात. बाल रोग विशेषज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांच्या मते, थॅलेसीमिया असे दोन प्रकार असतात.एक सौम्य असतो आणि एक भयंकर तीव्र प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सौम्य थॅलेसीमियाच्या प्रकारांमध्ये लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु तीव्र थॅलेसीमिया मध्ये मुलाला प्रत्येक 20 ते 25 दिवसांनंतर एक युनिट रक्त चढवावे लागते. वारंवार रक्त चढवल्याने अनेकदा शरीरामध्ये आयरन सुद्धा वाढून जाते त्यामुळे अन्य आजार होण्याची शक्यता असते. तीव्र थॅलेसेमीया बाधित असणाऱ्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी डोनर सहज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे अनेक मुलं आयुष्यभर या आजाराला सामोरे जात असतात. डॉ. प्रदीप यांच्या मते, जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर अशा वेळी संपूर्ण चाचणी करायला पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला कळून येईल की, आपल्याला कोण कोणते आजार आहेत किंवा नाही. 

थॅलेसीमियाची लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे

नेहमी अशक्तपणा जाणवतो.नखं, डोळे आणि जिभेवर पिवळा थर जमा होणे. मुलांची वाढ न होणे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स