शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:10 IST

उपवासात आपण शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात.

दिवसभरात आपण जे जे पदार्थ खातो. त्यातील काही घटकांचे रुपांतर टॉक्सिन्समध्ये होते. उपाशी राहिल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास कशी मदत होईल याबाबत आज सांगणार आहोत. जेव्हा आपण उपाशी राहतो तेव्हा शरीरात जमा झालेल्या ग्लुकोजचा वापर करण्यासाठी २४ ते ४८ तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर शरीरात फॅट्स बर्न व्हायला सुरूवात होते. नंतर किटोन बॉडीज तयार होतात. 

आपण जेव्हा काही खायला सुरवात करतो तेव्हा इन्सुलिनचा वापर व्हायला सुरूवात होते आणि जास्तीचे इन्सुलिन तयार व्हायला लागते. थोडक्यात जेवणानंतर अन्न पचनाच्यावेळी आलेल्या अन्नघटकांनुसार त्यांचे विघटन होते. कार्बचे साखरेत रुपांतर होते, इन्सुलिन सोबत ती रक्तात मिसळून लागणार्‍या सर्व पेशींना पोहचवली जाते. जास्तीची साखर अर्थात चरबीच्या रूपात लिव्हर व इतर भागात साठवली जाते.

किटोन बॉडीज शरीरातील एंटीऑक्सिडेशन वाढवतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिडेशची प्रक्रिया संथगतीने करता येऊ शकते. ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे शरीरातील प्रोटीन्स आणि सेल मेब्रेनच्या रचनेला नुकसान पोहोचते. शरीरात वाढलेली ऑक्सिडेशनची प्रक्रिया आपल्याला झपाट्याने वृधत्वाकडे नेते. व्हाईट सेल्स संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. यावेळेत डॅमेज सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर एनर्जेटिक सेल्स वेगाने निर्माण होता.

 

युनिव्हरसिटी ऑफ कॅलिफोर्नियाद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार एखादी व्यक्ती लागोपाठ  तीन दिवस उपवास ठेवून उपाशी राहत असेल. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कारण उपवासात आपण शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात.

हे फास्टींग करत असाताना रात्रीचे जेवण जेवायला ज्यांना उशीर होतो त्यांनी सकाळी नाश्ता वेळेवर घ्यायचा. दुपारचे जेवण घ्यायचे व रात्रीचे जेवण घेणे बंद करायचं.  सुरूवातीला डोकेदुखी, पित्त हे जाणवू शकते. त्यासाठी सतत पाणी पित राहणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा आपण पहिल्या खाण्याची वेळ पुढे ढकलतो तेव्हा ती वेळ पाळणे महत्वाचे. भूक  लागल्यास पाणी प्यावं, बरेचदा त्यामुळे  भूक कमी होते.

फास्टींगचे फायदे

फर्ट्स बर्न होण्यास सुरूवात होते. 

आकलन व स्मरणशक्ती वाढते.

डीएनए दुरूस्तीकामाची कार्यक्षमता वाढते.

न्युरॉनसाठी उपयुक्त अशा किटोन बॉडीज तयार होतात.

चिडचिड कमी होते. 

वजन कमी  होते.

गरोदर महिलांनी, बाळाला स्तनपान करणार्‍या महिलांनी, लहान मुलांनी या प्रकारचं फास्टिंग न करणंच उत्तम ठरेल. ह्या फास्टिंग दरम्यान साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे टाईप १ डायबिटीस असलेल्या लोकांनी हे फास्टींग डॉ. मार्गदर्शनाखालीच करावे. तसंच कमी ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनीही हे फास्टींग करताना काळजी घेणे अपेक्षित आहे कारण फास्टींगच्या काळात ब्लडप्रेशर कमी होते. 

कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण

CoronaVirus : आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र; जाणून घ्या खासियत 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स