शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आयुर्वेदिक काढा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो?; आयुष मंत्रालयाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:18 PM

Ayurvedic Kadha : आयुर्वेदिक काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 67,57,132 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,04,555 लोकांना जीव गमवावा लागला आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी विविध घरगुती उपाय केले जात आहेत. प्रामुख्याने अनेक जण आयुर्वेदिक काढा घेत आहेत. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत. 

आयुर्वेदिक काढा दीर्घकाळ घेतल्यानंतर यकृताला नुकसान होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आयुष मंत्रालयाने या दाव्याचं खंडन केलं आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्याने यकृताला नुकसान पोहोचतं ही धारणा चुकीची असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. कारण काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. दालचीन, तुळस आणि काळीमिरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली आहे. 

काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयाने अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचीन, काळीमिरी, सुंठ यांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयुष विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना सगळ्या प्रकारच्या रुग्णांना एलोपॅथी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. एलोपॅथी डॉक्टर आयुष औषधं लोकांना देत आहेत. अजूनही सगळ्या रुग्णांपर्यंत ही औषध पोहोचलेली नाहीत. तज्ज्ञांनी सांगितले की, याचा लाभ सगळ्याच रुग्णांना मिळायला हवा. त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.

जाणून घ्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स 

कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे. 

जेवण बनवत असताना हळद,  जीरं, धणे यांचा जास्तीत जास्त वापर करा. 

डायबिटीस असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशचे सेवन करावे.

दिवसातून दोनवेळा हर्बल टी, तुळशी,  दालचीनी, कालीमीरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचे सेवन करा. 

हळदीचे दूध प्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपायIndiaभारत