शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

हिवाळा संपताना 'ही' पथ्यं नक्की पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 16:16 IST

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार.

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार. कोणत्याही आजारांच्या इलाजाच्या अनुषंगाने आहार व इतर पथ्यांची चर्चा तर होतेच.

जुलाब झालेल्या रुग्णांचे पालक ताबडतोब जलसंजीवनी, इतर द्रवपदार्थ, दही, ताक, तांदळाचे पदार्थ अशा जुलाबांना बाधक नसणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगतात व रुग्णांचा आहार त्याप्रमाणे ठरवतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही साधक व काही बाधक समजुतींचा पगडा आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्यावर असतो.

दुधामुळे जुलाब वाढतात किंवा जुलाब आटोक्यात येण्यास वेळ लागतो, हा असाच एक समज. हा सर्वस्वी गैरसमज आहे, असेही नाही. काही प्रकारांच्या जुलाबांच्या बाबतीत डॉक्टर स्वत:च रुग्णांचे दुधाचे सेवन बंद करण्यास सांगतात. याला एक प्रमुख अपवाद म्हणजे मातेचे दूध. ते कधीही बंद करू नये.

डिहायड्रेशनमुळे थकलेल्या व शुष्क झालेल्या बालकांना ताकद यावी म्हणून काही पालक ग्लुकोज पावडर घातलेले पाणी पिण्यास देतात. प्रमाणानुसार न तयार केलेले ग्लुकोजचे मिश्रण सेवन केल्याने जुलाब वाढू शकतात. जलसंजीवनीमध्ये साखर व मीठ प्रमाणात असते, त्यामुळे आतड्यातून ते शोषले जाण्यास व शरीराची शुष्कता कमी होण्यास जशी मदत होते, तशी केवळ ग्लुकोज पावडरच्या पाण्याने होत नाही.

खाल्ल्याबरोबर लगेच जुलाब होतात, या कारणास्तव रुग्णांना घनपदार्थाचा आहार देणे टाळले जाते. रुग्णाला ताकद येण्यासाठी सतत थोडेथोडे घनपदार्थ, खासकरून पिष्टमय पदार्थ देणे कधीही योग्य. दूषित अन्नाचे सेवन पोटाच्या विकारांचे कारण असते. एकंदरीतच बाजारातील आणि त्यातही उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ टाळावेत. तळलेले व तिखट पदार्थ आम्लतेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारींच्या बाबतीत तिखट व तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.

दीर्घकाळ वापरलेले तेल, अतिआंबट व कच्ची फळे, जात्याच जास्त चीक असलेली फळे ( उदा.काजूचे फळ) खोकल्यास कारणीभूत होतात. याचा अर्थ, माफक तेल असलेल्या सर्वच खाद्यपदार्थांनी किंवा सर्वच फळांनी श्वसनविकार बळावतात, असे नाही. वरील उल्लेख करण्याचे कारण की, थंडीच्या मोसमात श्वसनविकार टाळण्यासाठी सरसकट मुलांना दही व फळे देणे टाळले जाते व त्यायोगे त्यांना पोषक अन्नपदार्थांपासून वंचित ठेवले जाते. मुलांना आवडणारी, पिकलेली, ताजी, ऋतुमानानुसार मिळणारी फळे, ताजे दही व ताक आवर्जून मुलांना द्यावे.

काही रुग्णांना ठरावीक अन्नपदार्थांचे सेवन केल्याने जुलाब, बाळदमा, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, आम्लता वाढून उलट्या होणे, असे आजार होतात. रुग्णांनी असे आजार बळावण्यास कारणीभूत होणारे पदार्थ जरूर टाळावेत. बऱ्याच व्यक्तींना वैयक्तिक अनुभवाअंती अशा आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या अन्नघटक व इतर घटकांची माहिती होते. त्यांनी अशा प्रकारचे पदार्थ व घटना टाळाव्यात.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स