शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळा संपताना 'ही' पथ्यं नक्की पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 16:16 IST

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार.

सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार. कोणत्याही आजारांच्या इलाजाच्या अनुषंगाने आहार व इतर पथ्यांची चर्चा तर होतेच.

जुलाब झालेल्या रुग्णांचे पालक ताबडतोब जलसंजीवनी, इतर द्रवपदार्थ, दही, ताक, तांदळाचे पदार्थ अशा जुलाबांना बाधक नसणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगतात व रुग्णांचा आहार त्याप्रमाणे ठरवतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही साधक व काही बाधक समजुतींचा पगडा आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्यावर असतो.

दुधामुळे जुलाब वाढतात किंवा जुलाब आटोक्यात येण्यास वेळ लागतो, हा असाच एक समज. हा सर्वस्वी गैरसमज आहे, असेही नाही. काही प्रकारांच्या जुलाबांच्या बाबतीत डॉक्टर स्वत:च रुग्णांचे दुधाचे सेवन बंद करण्यास सांगतात. याला एक प्रमुख अपवाद म्हणजे मातेचे दूध. ते कधीही बंद करू नये.

डिहायड्रेशनमुळे थकलेल्या व शुष्क झालेल्या बालकांना ताकद यावी म्हणून काही पालक ग्लुकोज पावडर घातलेले पाणी पिण्यास देतात. प्रमाणानुसार न तयार केलेले ग्लुकोजचे मिश्रण सेवन केल्याने जुलाब वाढू शकतात. जलसंजीवनीमध्ये साखर व मीठ प्रमाणात असते, त्यामुळे आतड्यातून ते शोषले जाण्यास व शरीराची शुष्कता कमी होण्यास जशी मदत होते, तशी केवळ ग्लुकोज पावडरच्या पाण्याने होत नाही.

खाल्ल्याबरोबर लगेच जुलाब होतात, या कारणास्तव रुग्णांना घनपदार्थाचा आहार देणे टाळले जाते. रुग्णाला ताकद येण्यासाठी सतत थोडेथोडे घनपदार्थ, खासकरून पिष्टमय पदार्थ देणे कधीही योग्य. दूषित अन्नाचे सेवन पोटाच्या विकारांचे कारण असते. एकंदरीतच बाजारातील आणि त्यातही उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ टाळावेत. तळलेले व तिखट पदार्थ आम्लतेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारींच्या बाबतीत तिखट व तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.

दीर्घकाळ वापरलेले तेल, अतिआंबट व कच्ची फळे, जात्याच जास्त चीक असलेली फळे ( उदा.काजूचे फळ) खोकल्यास कारणीभूत होतात. याचा अर्थ, माफक तेल असलेल्या सर्वच खाद्यपदार्थांनी किंवा सर्वच फळांनी श्वसनविकार बळावतात, असे नाही. वरील उल्लेख करण्याचे कारण की, थंडीच्या मोसमात श्वसनविकार टाळण्यासाठी सरसकट मुलांना दही व फळे देणे टाळले जाते व त्यायोगे त्यांना पोषक अन्नपदार्थांपासून वंचित ठेवले जाते. मुलांना आवडणारी, पिकलेली, ताजी, ऋतुमानानुसार मिळणारी फळे, ताजे दही व ताक आवर्जून मुलांना द्यावे.

काही रुग्णांना ठरावीक अन्नपदार्थांचे सेवन केल्याने जुलाब, बाळदमा, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे, आम्लता वाढून उलट्या होणे, असे आजार होतात. रुग्णांनी असे आजार बळावण्यास कारणीभूत होणारे पदार्थ जरूर टाळावेत. बऱ्याच व्यक्तींना वैयक्तिक अनुभवाअंती अशा आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या अन्नघटक व इतर घटकांची माहिती होते. त्यांनी अशा प्रकारचे पदार्थ व घटना टाळाव्यात.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स