शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 16:35 IST

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत.

(Image credit-Healthhavard.edu)

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमीतता या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देत आहेत. अश्यात आपल्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी  तसेच स्वतःला आजारमुक्त ठेवण्यासाठी काही घरगुती घटक उपयोगी ठरतात.

हिवाळ्यात डासांमुळे डेंग्यू मलेरीया सारखे आजार वाढत आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या भोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणं साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. काही घरगुती उपायांनी ताप, डेंग्यु यांसारख्या आजारांचा सामना करु शकतो.

पपई

पपई शरीरातील पेशी वाढववण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतं. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवते.

डाळिंब-

ताप आल्यानंतर जर डाळिंबाचा रस दिला. तर शरीरातील उष्णता कमी होते. आणि ताप उतरतो. तसेच अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात अशावेळी डाळींब खाणं फायदेशीर ठरतं. 

दुधी-

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी ठरते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी ही हृद्याशी निगडीत समस्यांपासुन बचाव करते.

बीट-

बीटाचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलीक असिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.

पाणी-

सर्दी असल्यास कोमट पाणी पिणं हा  चांगला  उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही इन्फेक्शन यामुळे होत नाही. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. आणि शरीर आजारांपासुन मुक्त राहते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य