शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 16:35 IST

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत.

(Image credit-Healthhavard.edu)

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमीतता या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देत आहेत. अश्यात आपल्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी  तसेच स्वतःला आजारमुक्त ठेवण्यासाठी काही घरगुती घटक उपयोगी ठरतात.

हिवाळ्यात डासांमुळे डेंग्यू मलेरीया सारखे आजार वाढत आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या भोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणं साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. काही घरगुती उपायांनी ताप, डेंग्यु यांसारख्या आजारांचा सामना करु शकतो.

पपई

पपई शरीरातील पेशी वाढववण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतं. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवते.

डाळिंब-

ताप आल्यानंतर जर डाळिंबाचा रस दिला. तर शरीरातील उष्णता कमी होते. आणि ताप उतरतो. तसेच अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात अशावेळी डाळींब खाणं फायदेशीर ठरतं. 

दुधी-

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी ठरते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी ही हृद्याशी निगडीत समस्यांपासुन बचाव करते.

बीट-

बीटाचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलीक असिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.

पाणी-

सर्दी असल्यास कोमट पाणी पिणं हा  चांगला  उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही इन्फेक्शन यामुळे होत नाही. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. आणि शरीर आजारांपासुन मुक्त राहते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य