शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जेवणाबाबत फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर डाएटची झंझट न ठेवता झटपट बारिक व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:10 IST

त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.

(Image credit- tripsavy)

आपण कितीही जरी डाएट करायचं ठरवलं तरी घरात अनेकदा तेलकट, चमचमीत पदार्थ तयार केले जात असल्यामुळे आपण अशा पदार्थांचा समावेश आहारात करत असतो. पण खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट नाही काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रिसर्चवर आधारित असलेले वजन कमी करण्याचे नवीन उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीतही नसतील.  चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो रिसर्च.

या रिसर्चनुसार सकाळच्या नाष्त्यानंतर रात्रीपर्यंत  सतत काहीनाकाही खात राहील्यामुळे वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.  संध्याकाळच्या जेवणानंतर सकाळच्या नाष्त्यापर्यंत उपवास केल्याने वजन नियंत्रणात राहतं.  हा रिसर्च पीएलओएस बायोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे. अमेरिकेच्या वेंडरबिल्ट यूनिवर्सिटीच्या रिसर्चकर्त्यांच्या मते वजन वाढून शरीरराचं असंतुल प्रामुख्याने व्यायामाचा अभाव असल्यामुळे होत असतं. रिसर्चकर्त्यांच्यामते दिवसाच्या ज्या वेळेत व्यक्ती अन्नाचं सेवन करत असतो. त्यावेळी व्यक्तीचे ‘बॉडी क्लॉक’ अशा पध्दतीने तयार होत असतं. जे वजन कमी होण्यासाठी फायदेशीर असतं.

जेवणाच्या योग्या वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ७ ते ८. या वेळी जेवत असल्यामुळे पूर्वीच्या काळातील लोक निरोगी असायची . आजही जास्त श्रमाची कामे करणारी कामगार मंडळी याच वेळांमध्ये जेवण करतांना आढळतात. ज्यांना या वेळा पाळणे शक्य आहे, त्यांनी अवश्य या वेळांतच जेवण करावे. ( हे पण वाचा- हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

आपण ज्या अन्नाचे सेवन करतो. त्याचे नीट पचन करण्यासाठी शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रात्री झोपण्यापूर्वी पचन संपूर्ण झालेलं  असतं. यासाठीही सूर्यास्तानंतर दीड दोन तांसाच्याआत जेवण पूर्ण झालेले असावे.  सध्याच्या धावपळीच्या जीवनात लवकर जेवण करणं शक्य नसेल तरी प्रयत्न करून तुम्ही जर लवकरात लवकर जेवाल तर नक्कीच फरक दिसून येईल.( हे पण वाचा-China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स