शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:53 IST

Hearing loss with covid-19 : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे

कोरोना संक्रमणामुळे फक्त फुफ्फुसं आणि हृदयावरच नाही तर तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित लोकांमध्ये कर्णबधिपणाची समस्या जाणवत आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की,  रुग्णालयातून उपचार घेऊन परत आलेल्या  १३ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर आणि एनआयएचआर मॅनचेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (बीआरसी)च्या वैज्ञानिकांनी अध्ययनातून हा खुलासा केला आहे. प्राध्यापक केविन मुनरो यांनी या अभ्यासादरम्यान  अशा ५६ लोकांना निवडलं ज्यांना कोरोनाच्या संक्रमाणानंतर कमी ऐकायला येत होते. ऐकण्याची समस्या उद्भवत असलेल्या ७.६ टक्के  लोकांना ऐकून येत नव्हतं तर १४.८ टक्के लोकांना  अनावश्यक आवाज ऐकू येत होते. तर चक्कर येत असलेल्या लोकांची  संख्या ७.२ होती.

तज्ज्ञ काय सांगतात

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधले प्राध्यापक आणि संशोधक केविन मुनरो यांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, याबाबत तज्ज्ञांनी अधिक लक्ष द्यायला हवं. कोरोनाचा सामना करत असलेल्यांना कानांची दीर्घकालीन समस्या उद्भवू शकते. याआधीही मेनिन्जाइटिस आणि  गोवर या आजारांमुळे ऐकण्याची समस्या कमी झालेली पाहायला मिळाली. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

यापूर्वी, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी म्हटले होते आहे की 45 वर्षीय कोविड -१९ पेशंटला  योग्य प्रकारे ऐकू येत नसल्याची समस्या उद्भवली होती. या रुग्णाला कोरोनाच्या उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून गेल्यानंतर त्यांना कानात मुंग्या येणे आणि ऐकू न येण्याची समस्या जाणवली. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, कोरोनाकाळाच त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला