शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:53 IST

Hearing loss with covid-19 : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे

कोरोना संक्रमणामुळे फक्त फुफ्फुसं आणि हृदयावरच नाही तर तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित लोकांमध्ये कर्णबधिपणाची समस्या जाणवत आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की,  रुग्णालयातून उपचार घेऊन परत आलेल्या  १३ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर आणि एनआयएचआर मॅनचेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (बीआरसी)च्या वैज्ञानिकांनी अध्ययनातून हा खुलासा केला आहे. प्राध्यापक केविन मुनरो यांनी या अभ्यासादरम्यान  अशा ५६ लोकांना निवडलं ज्यांना कोरोनाच्या संक्रमाणानंतर कमी ऐकायला येत होते. ऐकण्याची समस्या उद्भवत असलेल्या ७.६ टक्के  लोकांना ऐकून येत नव्हतं तर १४.८ टक्के लोकांना  अनावश्यक आवाज ऐकू येत होते. तर चक्कर येत असलेल्या लोकांची  संख्या ७.२ होती.

तज्ज्ञ काय सांगतात

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधले प्राध्यापक आणि संशोधक केविन मुनरो यांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, याबाबत तज्ज्ञांनी अधिक लक्ष द्यायला हवं. कोरोनाचा सामना करत असलेल्यांना कानांची दीर्घकालीन समस्या उद्भवू शकते. याआधीही मेनिन्जाइटिस आणि  गोवर या आजारांमुळे ऐकण्याची समस्या कमी झालेली पाहायला मिळाली. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

यापूर्वी, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी म्हटले होते आहे की 45 वर्षीय कोविड -१९ पेशंटला  योग्य प्रकारे ऐकू येत नसल्याची समस्या उद्भवली होती. या रुग्णाला कोरोनाच्या उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून गेल्यानंतर त्यांना कानात मुंग्या येणे आणि ऐकू न येण्याची समस्या जाणवली. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, कोरोनाकाळाच त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला