शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

Health Tips: दीर्घायुष्य मिळावं असे वाटत असेल तर चाळिशीनंतर 'हे' उपाय ताबडतोब अंमलात आणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:14 IST

Health Tips: पूर्वीच्या तुलनेत आताच्या पिढीचे जीवनमान ढासळत आहे, ते सुधारण्यासाठी हे नियम उपयोगी ठरतील. 

'शतायुषी भव' हा आशीर्वाद ऐकायला जितका छान वाटतो, तेवढा तो अंमलात येण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत कठीण वाटतो. कारण आहे आपली ढासळती जीवन शैली! तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजोबांपर्यंत मोबाईल नामक खेळण्याने सगळ्यांना वेड लावले आहे. त्यामुळे आपण आपली महत्त्वाची कामे, जबाबदाऱ्या विसरत चाललो आहोत. परंतु म्हणतात ना, अति तिथे माती! तशी वेळ येण्याआधी सावध होऊया. निदान वयाच्या चाळीशीनंतर स्वतःवर नियमांची चौकट आखून घेऊया. त्यामुळे केवळ आपली जीवन शैली सुधारेल असे नाही तर आपले आयुर्मानही वाढेल. कसे ते जाणून घ्या-

जेवण निम्मं करा : चाळिशीनंतर आपली पचनसंस्था मंदावते. खाण्याचा उत्साह दांडगा असला तरी पचन क्षमता कमी झाल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत न होता मेदात होते आणि सुस्तपणा वाढतो. आळस चढतो. त्यामुळे जेवणावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे ठरते. 

पाणी दुप्पट प्या : वाढत्या वयात पचन क्रियेला वेग देण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने वाढत्या वयाच्या दृष्टीने त्याचा शरीराला उपयोग होतो. जेवणाचे प्रमाण कमी करून पाण्याची मात्रा प्रमाणात वाढवली तर भूक नियंत्रणात ठेवता येते. 

परिश्रम तिप्पट करा : वय वाढू लागले की थकवा वाढतो. कारण शरीर अकार्यक्षम होते. ते कार्यन्वित ठेवण्यासाठी परिश्रमाची पातळी वाढवा. भरपूर चाला, जेणेकरून गोळ्या घेऊन झोप येण्याची वाट बघावी लागणार नाही, उलट थकव्याने पाठ टेकवता क्षणीच गाढ झोप लागेल. 

हसणं चौपट करा : दिवसेंदिवस आपण हसणं विसरत चाललो आहोत. मोबाईलमध्ये इमोजी आहेत, विनोदी व्हीडोओ आहेत, परंतु आपण मख्ख चेहऱ्याने ते पाहत असू तर त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही. म्हणून लहान मुलांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. हसा, आनंदी राहा. 

नियमित प्राणायाम करा : आपण रोज आपल्याही नकळत श्वसन करतो, मात्र शरीरातील यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी दीर्घ प्राणायाम गरजेचा आहे. म्हणून प्राणायामाची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे मन शांत होतं, नैराश्य जातं आणि आयुष्य वाढते. 

साधी जीवनशैली अंगिकारा : आपण म्हणतो ना, प्रवासात सामान जितके कमी तेवढा प्रवास सुखकर, तसाच आपला जीवन प्रवास सोपा करायचा असेल तर अपेक्षांचे ओझे कमी करून साधी जीवन शैली अंगिकारायला हवी. त्यामुळे जीवन सुसह्य होईल आणि आयुर्मान वाढेल. 

कमी प्रक्रिया केलेलं ऍन खाण्यावर भर द्या : कदान्न अर्थात कच्चे अन्न खाणे केव्हाही चांगले. मोड आलेली कडधान्य, उकडलेल्या भाज्या, कंदमुळं पचनास आणि आरोग्यास चांगले. तसेच ताजे, सात्विक अन्नही चांगले. परंतु फार प्रक्रिया केलेले, शिळे अन्न कदापि चांगले नाही. 

आठवड्यातून एक दिवस उपास करा : ज्याप्रमाणे यंत्र सुरळीत चालावे म्हणून आपण एक दिवस त्याला विश्रांती देतो, तशी शरीर यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून आठवड्यातून एकदा उपास जरूर करावा. 

रागावर नियंत्रण ठेवा : बालपण आणि तारुण्यात आपले रागावर नियंत्रण नसते, मात्र वाढत्या वयानुसार समजूतदारपणा वाढणेही अपेक्षित असते. तसे झाले नाही तर रागावर नियंत्रण राहणार नाही आणि अकारण विविध आजार मागे लागतील. म्हणून जाणीवपूर्वक रागावर नियंत्रण मिळवायला शिका. 

पुरेशी विश्रांती घ्या : जितके काम महत्त्वाचे तेवढाच आरामही महत्त्वाचा! दोन्हीचा योग्य समतोल आखला तरच शरीराला योग्य वंगण मिळेल आणि शरीर कार्यरत राहील. विश्रांतीची वेळ ठरवा आणि तेवढीच विश्रांती घेऊन उत्साहाने कामाला लागा. 

आजूबाजूचे वातारवण प्रसन्न राहील याची काळजी घ्या : आपण स्वयंप्रेरित असलो, तरी सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर परिणाम होत असतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न करा. 

ऋतुमानानुसार आहारात बदल करा : आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत व त्यात विशेषतः फळांचा समावेश असावा. ऋतुमानानुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा. ती फळे आपल्या शरीराला मानवतात आणि पोषक ठरतात. 

मनाची मशागत करा : दिवसभरातुन १० मिनिटं तरी स्वतःसाठी काढा. असे म्हणतात की आपण स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी जो वेळ काढतो तो फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आत्मसंवाद वगळू नका. बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यात सामावलेली असतात. त्या चिंतनातून मनाची उत्तम मशागत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य