शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

Health Tips: दीर्घायुष्य मिळावं असे वाटत असेल तर चाळिशीनंतर 'हे' उपाय ताबडतोब अंमलात आणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:14 IST

Health Tips: पूर्वीच्या तुलनेत आताच्या पिढीचे जीवनमान ढासळत आहे, ते सुधारण्यासाठी हे नियम उपयोगी ठरतील. 

'शतायुषी भव' हा आशीर्वाद ऐकायला जितका छान वाटतो, तेवढा तो अंमलात येण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत कठीण वाटतो. कारण आहे आपली ढासळती जीवन शैली! तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजोबांपर्यंत मोबाईल नामक खेळण्याने सगळ्यांना वेड लावले आहे. त्यामुळे आपण आपली महत्त्वाची कामे, जबाबदाऱ्या विसरत चाललो आहोत. परंतु म्हणतात ना, अति तिथे माती! तशी वेळ येण्याआधी सावध होऊया. निदान वयाच्या चाळीशीनंतर स्वतःवर नियमांची चौकट आखून घेऊया. त्यामुळे केवळ आपली जीवन शैली सुधारेल असे नाही तर आपले आयुर्मानही वाढेल. कसे ते जाणून घ्या-

जेवण निम्मं करा : चाळिशीनंतर आपली पचनसंस्था मंदावते. खाण्याचा उत्साह दांडगा असला तरी पचन क्षमता कमी झाल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत न होता मेदात होते आणि सुस्तपणा वाढतो. आळस चढतो. त्यामुळे जेवणावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे ठरते. 

पाणी दुप्पट प्या : वाढत्या वयात पचन क्रियेला वेग देण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने वाढत्या वयाच्या दृष्टीने त्याचा शरीराला उपयोग होतो. जेवणाचे प्रमाण कमी करून पाण्याची मात्रा प्रमाणात वाढवली तर भूक नियंत्रणात ठेवता येते. 

परिश्रम तिप्पट करा : वय वाढू लागले की थकवा वाढतो. कारण शरीर अकार्यक्षम होते. ते कार्यन्वित ठेवण्यासाठी परिश्रमाची पातळी वाढवा. भरपूर चाला, जेणेकरून गोळ्या घेऊन झोप येण्याची वाट बघावी लागणार नाही, उलट थकव्याने पाठ टेकवता क्षणीच गाढ झोप लागेल. 

हसणं चौपट करा : दिवसेंदिवस आपण हसणं विसरत चाललो आहोत. मोबाईलमध्ये इमोजी आहेत, विनोदी व्हीडोओ आहेत, परंतु आपण मख्ख चेहऱ्याने ते पाहत असू तर त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही. म्हणून लहान मुलांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. हसा, आनंदी राहा. 

नियमित प्राणायाम करा : आपण रोज आपल्याही नकळत श्वसन करतो, मात्र शरीरातील यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी दीर्घ प्राणायाम गरजेचा आहे. म्हणून प्राणायामाची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे मन शांत होतं, नैराश्य जातं आणि आयुष्य वाढते. 

साधी जीवनशैली अंगिकारा : आपण म्हणतो ना, प्रवासात सामान जितके कमी तेवढा प्रवास सुखकर, तसाच आपला जीवन प्रवास सोपा करायचा असेल तर अपेक्षांचे ओझे कमी करून साधी जीवन शैली अंगिकारायला हवी. त्यामुळे जीवन सुसह्य होईल आणि आयुर्मान वाढेल. 

कमी प्रक्रिया केलेलं ऍन खाण्यावर भर द्या : कदान्न अर्थात कच्चे अन्न खाणे केव्हाही चांगले. मोड आलेली कडधान्य, उकडलेल्या भाज्या, कंदमुळं पचनास आणि आरोग्यास चांगले. तसेच ताजे, सात्विक अन्नही चांगले. परंतु फार प्रक्रिया केलेले, शिळे अन्न कदापि चांगले नाही. 

आठवड्यातून एक दिवस उपास करा : ज्याप्रमाणे यंत्र सुरळीत चालावे म्हणून आपण एक दिवस त्याला विश्रांती देतो, तशी शरीर यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून आठवड्यातून एकदा उपास जरूर करावा. 

रागावर नियंत्रण ठेवा : बालपण आणि तारुण्यात आपले रागावर नियंत्रण नसते, मात्र वाढत्या वयानुसार समजूतदारपणा वाढणेही अपेक्षित असते. तसे झाले नाही तर रागावर नियंत्रण राहणार नाही आणि अकारण विविध आजार मागे लागतील. म्हणून जाणीवपूर्वक रागावर नियंत्रण मिळवायला शिका. 

पुरेशी विश्रांती घ्या : जितके काम महत्त्वाचे तेवढाच आरामही महत्त्वाचा! दोन्हीचा योग्य समतोल आखला तरच शरीराला योग्य वंगण मिळेल आणि शरीर कार्यरत राहील. विश्रांतीची वेळ ठरवा आणि तेवढीच विश्रांती घेऊन उत्साहाने कामाला लागा. 

आजूबाजूचे वातारवण प्रसन्न राहील याची काळजी घ्या : आपण स्वयंप्रेरित असलो, तरी सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर परिणाम होत असतो. म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न करा. 

ऋतुमानानुसार आहारात बदल करा : आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत व त्यात विशेषतः फळांचा समावेश असावा. ऋतुमानानुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा. ती फळे आपल्या शरीराला मानवतात आणि पोषक ठरतात. 

मनाची मशागत करा : दिवसभरातुन १० मिनिटं तरी स्वतःसाठी काढा. असे म्हणतात की आपण स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी जो वेळ काढतो तो फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आत्मसंवाद वगळू नका. बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यात सामावलेली असतात. त्या चिंतनातून मनाची उत्तम मशागत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य