शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

किडनीचे विकार असणाऱ्यांनी लिंबूपाणी प्यावे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:49 IST

लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणं हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. लिंबामध्ये 'क' जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मूत्रपिंडाशी (किडनी - Kidney) संबंधित समस्या असलेल्या रुग्णांवर काय होतो परिणाम ?लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून बाहेर टाकण्याचं काम करतं. यासोबतच रक्तदाब नियंत्रित करणं, हाडांचं आरोग्य नियंत्रित करणं तसंच, क्रिएटिनिन आणि युरिक अ‌ॅसिडसारख्या रसायनांची पातळी नियंत्रित करणं हे देखील काम मूत्रपिंड करतं.

क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic kidney disease) ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण किंवा रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम (फिल्टर - Filter - गाळणे) पूर्ण ताकदीनं करू शकत नाही. त्यामुळं रक्तात विषारी आणि टाकाऊ पदार्थ तसेच राहतात किंवा ते जमा होण्याचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं आणि यामुळं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिन (Creatinine) कमी होते का?लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिनची पातळी कमी होत नाही, पण ती वाढतही नाही. क्रिएटिनिन शरीरात तयार होणारा अपायकारक पदार्थ किंवा कचरा उत्पादन आहे. स्त्रियांमध्ये, क्रिएटिनिनची पातळी सामान्यतः ९५ मिली प्रतिमिनिट पर्यंत असते. तर पुरुषांमध्ये ते १२० मि.ली.पर्यंत असते.

शरीरातील क्रिएटिनिन क्लिअरन्सवर (creatinine clearance) मूत्रपिंडं कसं कार्य करतात, हे तुमचं वय, वजन आणि मूत्रपिंडाची स्थिती यावर अवलंबून असतं. लिंबू पाणी प्यायल्याने क्रिएटिनिनची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही. मूत्रपिंडाचा आजार तीव्र असलेल्या रुग्णांना लिंबूपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ते जास्त प्रमाणात पिऊ नका.

जास्त प्रमाणात लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्याने मळमळ, चक्कर येणे, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. कारण याच्यामुळं लघवीचं प्रमाण वाढतं. वारंवार लघवीला गेल्यामुळं शरीरातून द्रव काढून बाहेर टाकला जातो. यामुळं डिहायड्रेशनचा (Dehydration - शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं) त्रास होऊ शकतो.

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळलिंबूपाणी पिण्याची अशी काही निश्चित वेळ नाही. तथापि, सकाळी ते प्यायल्यानं तुम्हाला सर्वांत जास्त फायदा होईल. कारण, ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करते. जर तुम्ही काही अल्कलाईन घेतले तर, ते pH संतुलन राखण्यास मदत करते.

अधिक फायदे मिळवण्यासाठी आले आणि मध घालून लिंबू पाणी पिऊ शकता. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे किडनीच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स