शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

किडनीचे विकार असणाऱ्यांनी लिंबूपाणी प्यावे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:49 IST

लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणं हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. लिंबामध्ये 'क' जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मूत्रपिंडाशी (किडनी - Kidney) संबंधित समस्या असलेल्या रुग्णांवर काय होतो परिणाम ?लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून बाहेर टाकण्याचं काम करतं. यासोबतच रक्तदाब नियंत्रित करणं, हाडांचं आरोग्य नियंत्रित करणं तसंच, क्रिएटिनिन आणि युरिक अ‌ॅसिडसारख्या रसायनांची पातळी नियंत्रित करणं हे देखील काम मूत्रपिंड करतं.

क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic kidney disease) ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण किंवा रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम (फिल्टर - Filter - गाळणे) पूर्ण ताकदीनं करू शकत नाही. त्यामुळं रक्तात विषारी आणि टाकाऊ पदार्थ तसेच राहतात किंवा ते जमा होण्याचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं आणि यामुळं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिन (Creatinine) कमी होते का?लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिनची पातळी कमी होत नाही, पण ती वाढतही नाही. क्रिएटिनिन शरीरात तयार होणारा अपायकारक पदार्थ किंवा कचरा उत्पादन आहे. स्त्रियांमध्ये, क्रिएटिनिनची पातळी सामान्यतः ९५ मिली प्रतिमिनिट पर्यंत असते. तर पुरुषांमध्ये ते १२० मि.ली.पर्यंत असते.

शरीरातील क्रिएटिनिन क्लिअरन्सवर (creatinine clearance) मूत्रपिंडं कसं कार्य करतात, हे तुमचं वय, वजन आणि मूत्रपिंडाची स्थिती यावर अवलंबून असतं. लिंबू पाणी प्यायल्याने क्रिएटिनिनची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही. मूत्रपिंडाचा आजार तीव्र असलेल्या रुग्णांना लिंबूपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ते जास्त प्रमाणात पिऊ नका.

जास्त प्रमाणात लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्याने मळमळ, चक्कर येणे, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. कारण याच्यामुळं लघवीचं प्रमाण वाढतं. वारंवार लघवीला गेल्यामुळं शरीरातून द्रव काढून बाहेर टाकला जातो. यामुळं डिहायड्रेशनचा (Dehydration - शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं) त्रास होऊ शकतो.

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळलिंबूपाणी पिण्याची अशी काही निश्चित वेळ नाही. तथापि, सकाळी ते प्यायल्यानं तुम्हाला सर्वांत जास्त फायदा होईल. कारण, ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करते. जर तुम्ही काही अल्कलाईन घेतले तर, ते pH संतुलन राखण्यास मदत करते.

अधिक फायदे मिळवण्यासाठी आले आणि मध घालून लिंबू पाणी पिऊ शकता. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे किडनीच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स