शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

किडनीचे विकार असणाऱ्यांनी लिंबूपाणी प्यावे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:49 IST

लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणं हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. लिंबामध्ये 'क' जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मूत्रपिंडाशी (किडनी - Kidney) संबंधित समस्या असलेल्या रुग्णांवर काय होतो परिणाम ?लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून बाहेर टाकण्याचं काम करतं. यासोबतच रक्तदाब नियंत्रित करणं, हाडांचं आरोग्य नियंत्रित करणं तसंच, क्रिएटिनिन आणि युरिक अ‌ॅसिडसारख्या रसायनांची पातळी नियंत्रित करणं हे देखील काम मूत्रपिंड करतं.

क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic kidney disease) ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण किंवा रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम (फिल्टर - Filter - गाळणे) पूर्ण ताकदीनं करू शकत नाही. त्यामुळं रक्तात विषारी आणि टाकाऊ पदार्थ तसेच राहतात किंवा ते जमा होण्याचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं आणि यामुळं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिन (Creatinine) कमी होते का?लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिनची पातळी कमी होत नाही, पण ती वाढतही नाही. क्रिएटिनिन शरीरात तयार होणारा अपायकारक पदार्थ किंवा कचरा उत्पादन आहे. स्त्रियांमध्ये, क्रिएटिनिनची पातळी सामान्यतः ९५ मिली प्रतिमिनिट पर्यंत असते. तर पुरुषांमध्ये ते १२० मि.ली.पर्यंत असते.

शरीरातील क्रिएटिनिन क्लिअरन्सवर (creatinine clearance) मूत्रपिंडं कसं कार्य करतात, हे तुमचं वय, वजन आणि मूत्रपिंडाची स्थिती यावर अवलंबून असतं. लिंबू पाणी प्यायल्याने क्रिएटिनिनची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही. मूत्रपिंडाचा आजार तीव्र असलेल्या रुग्णांना लिंबूपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ते जास्त प्रमाणात पिऊ नका.

जास्त प्रमाणात लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्याने मळमळ, चक्कर येणे, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. कारण याच्यामुळं लघवीचं प्रमाण वाढतं. वारंवार लघवीला गेल्यामुळं शरीरातून द्रव काढून बाहेर टाकला जातो. यामुळं डिहायड्रेशनचा (Dehydration - शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं) त्रास होऊ शकतो.

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळलिंबूपाणी पिण्याची अशी काही निश्चित वेळ नाही. तथापि, सकाळी ते प्यायल्यानं तुम्हाला सर्वांत जास्त फायदा होईल. कारण, ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करते. जर तुम्ही काही अल्कलाईन घेतले तर, ते pH संतुलन राखण्यास मदत करते.

अधिक फायदे मिळवण्यासाठी आले आणि मध घालून लिंबू पाणी पिऊ शकता. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे किडनीच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स