शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण?

By manali.bagul | Updated: November 10, 2020 17:29 IST

Health Tips in marathi : शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणं अशा आजारांचा सामना करावा लागतो.  

सण उत्सव सगळ्यांसाठीच खास असतात.  त्यातल्या त्यात दिवाळी म्हटलं की, फराळ आणि गोड धोड पदार्थ हे आलेच. कितीही नाही म्हटलं  तरी गोड, चमचमीत  खाण्याचा मोह आवरता येत नाही. 'थोडंस खाल्लं तर काही नाही होतं', असं म्हणत तेलकट, तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. परिणामी  शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणं अशा आजारांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ  खात असताना तब्येतीची कशी काळजी घेता येईल याबाबत सांगणार आहोत.

एका रिसर्चनुसार दिवाळीच्या काळात लोकांच्या शरीरातील साखरच्या पातळीत वाढ होते. सण उत्सवांच्या काळात  250 मिलीग्राम डीएलच्या वरील  लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढ होते. ३०० मिलिग्राम डीएलच्या वर लोकांमध्ये १८ टक्के वाढ दिसून आली होती.   खासकरून दिवाळीच्या दिवसात जास्तीत जास्त तेलकट, गोड पदार्थांचा आहारात समावेश केल्याने या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

जास्त न खाता प्रमाणात खा

जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणं टाळा.  दिवसातून ३- ४ वेळा ठराविक वेळेचे अंतर ठेवून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला पोषक तत्व मिळतील. 

हेल्दी स्नॅक्स घ्या 

दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखणं खूप कठीण असतं.  जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.  गोड खावंस वाटल्यास तुम्ही ताजी फळं खाऊ शकतं  तसंच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

गोड कमी खा

डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या  दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयांचे  सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल. 

...म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

ब्राऊस राईस खा

अनेकांना पांढरा भात अधिक खायला आवडतं. कारण  रोजच्या जेवणाचा तो भाग असतो.  पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास  रक्तातील साखर नियंत्रण राहील.

व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे ८० % लोक साथीच्या आजारांना पडताहेत बळी; वेळीच आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका

दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय मादत पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी  कारणीभूत ठरू शकतं. म्हणून  दारू, सिगारेट  अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नका.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सdiabetesमधुमेहDiwaliदिवाळी