शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 19:55 IST

CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

कोरोना व्हायरसने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या जगभरातील एकूण ४ हजार  वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या माहामारीबाबत एक आवाहन केलं आहे. एंटी लॉकडाऊन पिटिशनमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

वैज्ञानिकांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसपासून ज्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे. त्या लोकांना वगळता इतरांचे जीवन सर्वसामान्य व्हायरला हवं.'' वयस्कर, लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. metro.co.uk च्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड, नॉटिंघम, एडिनबर्ग, कँब्रिज, ससेक्ससह अन्य युनिव्हर्सिटीतील वैज्ञानीकांनी लोकांना सर्व सामान्य जीवन जगण्यासाठी आवाहन केलं आहे.

कारण सामाजिकदृष्या लोकांवर घालण्यात आलेल्या बंधनांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अन्य काही तज्ज्ञांनी या पिटिशनचा विरोध करत कोरोना व्हायरसमुळे लोकांचे जीवन आणि आरोग्य पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकतं असं म्हणलं आहे. तसंच हर्ड इम्यूनिटी तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पेटिशनमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे लोकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

वैज्ञानिकांनी पिटीशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार लोकांवर घातलेल्या अन्य बंधनांमुळे मृत्यूदर वाढू शकतो. तसंच मुलांना शाळांपासून दूर ठेवणं अन्यायकारक आहे.  जोपर्यंत लस येत नाही  तोपर्यंत अशीच बंधनं घालून ठेवली तर मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून समााजातील मागास घटकांचे यामुळे जास्त नुकसान होऊ शकते.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

२०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी  येणार याची  सविस्तर माहिती दिली होती. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

साधारणपणे भारतातील  २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला