शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 19:55 IST

CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

कोरोना व्हायरसने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या जगभरातील एकूण ४ हजार  वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या माहामारीबाबत एक आवाहन केलं आहे. एंटी लॉकडाऊन पिटिशनमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

वैज्ञानिकांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसपासून ज्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे. त्या लोकांना वगळता इतरांचे जीवन सर्वसामान्य व्हायरला हवं.'' वयस्कर, लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. metro.co.uk च्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड, नॉटिंघम, एडिनबर्ग, कँब्रिज, ससेक्ससह अन्य युनिव्हर्सिटीतील वैज्ञानीकांनी लोकांना सर्व सामान्य जीवन जगण्यासाठी आवाहन केलं आहे.

कारण सामाजिकदृष्या लोकांवर घालण्यात आलेल्या बंधनांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अन्य काही तज्ज्ञांनी या पिटिशनचा विरोध करत कोरोना व्हायरसमुळे लोकांचे जीवन आणि आरोग्य पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकतं असं म्हणलं आहे. तसंच हर्ड इम्यूनिटी तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पेटिशनमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे लोकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

वैज्ञानिकांनी पिटीशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार लोकांवर घातलेल्या अन्य बंधनांमुळे मृत्यूदर वाढू शकतो. तसंच मुलांना शाळांपासून दूर ठेवणं अन्यायकारक आहे.  जोपर्यंत लस येत नाही  तोपर्यंत अशीच बंधनं घालून ठेवली तर मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून समााजातील मागास घटकांचे यामुळे जास्त नुकसान होऊ शकते.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

२०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी  येणार याची  सविस्तर माहिती दिली होती. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

साधारणपणे भारतातील  २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला