शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

लोकांना सामान्य आयुष्य जगू द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४०० वैज्ञानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 19:55 IST

CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

कोरोना व्हायरसने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या जगभरातील एकूण ४ हजार  वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या माहामारीबाबत एक आवाहन केलं आहे. एंटी लॉकडाऊन पिटिशनमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. 

वैज्ञानिकांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसपासून ज्या लोकांना सगळ्यात जास्त धोका आहे. त्या लोकांना वगळता इतरांचे जीवन सर्वसामान्य व्हायरला हवं.'' वयस्कर, लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. metro.co.uk च्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड, नॉटिंघम, एडिनबर्ग, कँब्रिज, ससेक्ससह अन्य युनिव्हर्सिटीतील वैज्ञानीकांनी लोकांना सर्व सामान्य जीवन जगण्यासाठी आवाहन केलं आहे.

कारण सामाजिकदृष्या लोकांवर घालण्यात आलेल्या बंधनांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अन्य काही तज्ज्ञांनी या पिटिशनचा विरोध करत कोरोना व्हायरसमुळे लोकांचे जीवन आणि आरोग्य पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकतं असं म्हणलं आहे. तसंच हर्ड इम्यूनिटी तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पेटिशनमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाकाळात तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे लोकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

वैज्ञानिकांनी पिटीशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार लोकांवर घातलेल्या अन्य बंधनांमुळे मृत्यूदर वाढू शकतो. तसंच मुलांना शाळांपासून दूर ठेवणं अन्यायकारक आहे.  जोपर्यंत लस येत नाही  तोपर्यंत अशीच बंधनं घालून ठेवली तर मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून समााजातील मागास घटकांचे यामुळे जास्त नुकसान होऊ शकते.  दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

२०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोनाची लस कधी  येणार याची  सविस्तर माहिती दिली होती. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

साधारणपणे भारतातील  २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला