शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Corona second wave : महिन्याच्या शेवटी होणार कोरोना लाटेचा उद्रेक; अखेर दिलासा मिळणार तरी कधी? तज्ज्ञ म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:31 IST

Corona second wave : आयआयटी कानपूर (IIT Kanpur) टीमनं गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना २० ते २५ एप्रिलदरम्यान  कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. कोरोनाबाबत नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर, आयआयटी कानपूर (IIT Kanpur) टीमनं गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना २० ते २५ एप्रिलदरम्यान  कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, ''कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा अधिक भयंकर असल्याचं चित्र आहे. 15 एप्रिल म्हणजेच गुरुवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येनं नवीन उच्चांक गाठला आहे. अजूनही संकट कमी झालेलं नाही. आमच्या तज्ज्ञांनी टिम कोरोनावर गणितीय मॉडेलच्या आधारे लक्ष ठेवूनआहे. यानुसार, २० ते २५ एप्रिलदरम्यान कोरोनाचा धोका वाढणार आहे. यानंतर काही प्रमाणात दिलासादायक स्थिती उद्भवू शकते.''

पुढे त्यांनी सांगितले की,'' २५ एप्रिलनंतर कोरोनाच्या संसर्गापासून दिलासा मिळण्यास सुरुवात होईल आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. मे अखेरपर्यंत स्थिती सामान्य होण्यास सुरुवात होईल. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये जवळपास स्थिती सामान्य दिसून येईल. जिथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तिथेही मे अखेरपर्यंत परिस्थिती सुरळीत व्हायला सुरू होईल. सध्याची लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे, कारण यावेळी दररोजचा मृत्यूदर बाधितांच्या प्रमाणानुसार मागील वेळीपेक्षा कमी आहे. लस आल्यानंतर लोकांनी नियमांच्या पालनाबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढलं.'' लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

दरम्यान  गुरुवारी ६१ हजार ६९५ रुग्ण आणि ३४९ मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५ झाली असून बळींचा आकडा ५९ हजार १५३ इतका आहे. सध्या राज्यात ६ लाख २० हजार ६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के आहे. 

येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती

सध्या राज्यातील मृत्युदर १.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ८७ हजार ४८७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस