शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आयुर्वेद वैद्यांनी सांगितले उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचे बेस्ट उपाय, पण घ्या ही काळजी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:32 IST

Health Tips : या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी फाय फायदेशीर ठरते. सोबत यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी हेही सांगितलं.

Health Tips : उन्हाळ्यात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. पोटाच्या समस्या जास्त आहेत. अशात पोट थंड ठेवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी लोक वेगवेगळी उपाय करतात. आम्हीही आज तुम्हाला दोन खास उपाय सांगणार आहोत. आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी सांगितलं की, या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी फाय फायदेशीर ठरते. सोबत यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी हेही सांगितलं.

धणे-जिरे पाण्याचे फायदे

पोटातील जळजळ दूर होते 

उन्हाळ्यात जर तुम्ही रोज धणे व जिऱ्याचं पाणी प्याल तर पोटातील जळजळ कमी करण्यास मदत मिळते. या दोन्ही मसाल्यांमध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सीडेंट गुणांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. पोट थंड राहतं आणि आराम मिळतो.

लघवीची जळजळ होईल कमी

उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना लघवी करताना जळजळ होते. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. तसं तर लघवी करताना जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण जर घरी धणे आणि जिऱ्याचं पाणी प्याल तर लघवी करतानाची जळजळ कमी होऊ शकते. 

पित्त शांत होतं

ज्या लोकांना पित्तासंबंधी समस्या असेल त्यांचं उन्हाळ्यात पित्त वाढू लागतं. अशात त्यांना अॅसिडिटी, लाल चट्टे आणि खाजेची समस्या होऊ शकते. अशात धणे आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात रोज धणे आणि जिऱ्याचं पाणी प्याल तर याने पित्तामध्ये संतुलन राहतं.

वाळा घातलेल्या पाण्याचे फायदे

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक मडक्यातील पाण्यात वाळा टाकतात. याने सुगंधही चांगला येतो आणि आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. यात  मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडंट असतात. शिवाय या पाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसंच फ्री रेडिकल्सपासून होणारं शरीरातील उती, पेशी आणि अवयवांचे नुकसान टाळता येतं. वाळ्यात मोठया प्रमाणावर झिंक असल्याने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांच्या समस्या आणि जळजळ कमी होते. शिवाय वाळ्यामध्ये लोह, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बीदेखील असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रित होतो. रक्तदाब नियंत्रित झाल्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. त्वचेचा पोत सुधारल्यामुळे उन्हाळ्यातही तुम्ही टवटवीत दिसता. एवढंच नाही तर या काळात वारंवार होणारं युटीआय अथवा मूत्रमार्गातील इनफेक्शन टाळण्यासाठी, तीव्र ताप कमी करण्यासाठी वाळ्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. 

कसं बनवाल धणे-जिऱ्याचं पाणी?

धणे आणि जिऱ्याचं पाणी बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घ्या. हे एक ग्लास पाण्यात टाका. हे पाणी थोड्या वेळासाठी उकडून घ्या आणि नंतर गाळून या पाण्याचं सेवन करा. रोज सकाळी याचं सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील. हा उपाय करण्याआधी एकदा डॉक्टर किंवा आयुर्वेदिक एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.

काय घ्यावी काळजी?

आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, तापमानातली वाढ पाहता; शरीराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे दोन मार्ग म्हणजे धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. 

घ्यायची काळजी; 

१. रात्रभर धणे जिरे भिजत घालू नयेत. जेमतेम पाऊण एक तास भिजवून ते पाणी गाळून घ्यावे. (प्रमाण हे अनुभवानुसार ठेवावे.)

२. वाळ्याच्या जुडीचा दोरा सोडवून मग वापर करावा. आठवड्यातून एकदा जुडीला ऊन दाखवावे. 

वरील दोन्ही उपायांनी सब्जासारख्या अन्य उपायांसारखा भूक कमी होणे, सर्दी होणे वगैरे दुष्परिणाम दिसत नाही हे विशेष. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य