शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणवयात मधुमेह टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 08:30 IST

पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर केला तर मधुमेह टाळता येऊ शकतो.

पुणे : नुकताच जागतिक मधुमेह दिन जगभरात साजरा करण्यात आला. याच विषयावर पुण्यातील मधुमेहतज्ञ डॉ स्नेहल देसाई यांच्याशी लोकमतने खास संवाद साधला. त्याचाच हा सारांश. 

 

प्रश्न :मधुमेह कमी वयात होण्याचे प्रमाण वाढल्याचे जाणवत आहे का ?

उत्तर : हो सध्या हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पूर्वी साधारपणे चाळिशीनंतर आढळणारा मधुमेह आता अगदी तिशीच्या आताही आढळत आहे. हे येणाऱ्या पिढीसाठी धोकेदायक लक्षण आहे. तरुणांनी याचा गांभीर्याने विचार करत जीवनशैलीत बदल करायला हवा. 

 

प्रश्न :मधुमेहाची लक्षणे काय आहेत ?

उत्तर :अशी विशेष लक्षणं मधुमेहाची नाहीत. पण चक्कर येणे, अचानक वजन कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे अशी लक्षणे सर्वसाधारणे  आढळतात. चाळीशीनंतरच्या आरोग्य तपासणीत रक्तातली साखर दर सहा महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे. आई किंवा वडिलांना मधुमेह तर तीन महिन्यांनी तपासणी करावी. 

 

 प्रश्न :मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत प्रकर्षाने कोणते बदल करायला हवेत ?

उत्तर :पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर केला तर मधुमेह टाळता येऊ शकतो. मधुमेह आयुष्य संपवणारा आजार नक्कीच नाही पण तो कमी वयात होणे फारसे चांगले नाही. त्यामुळे अनेक बंधने येतात. त्यामुळे थोडीशी शिस्त आणि काही नियम पळून मधुमेहाचे येणे लांबवणे शक्य आहे. 

 

प्रश्न :मधुमेह पूर्ण बरा होतो का ? 

उत्तर :मधुमेह झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. पण हा आजार कधीच पूर्ण बरा होत नाही हे आधी लक्षात घेण्याची गरज आहे. मात्र पथ्य पाळून तो नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्याचे अधिक नुकसान न करता आणि मधुमेह पूर्ण बरा होतो या प्रलोभनाला न भूलता औषोधोपचार करून योग्य जीवशैली आचरणात आणण्याची गरज आहे.

 

प्रश्न : स्वतःला हवं तेव्हा गोळ्या कमी जास्त करणे योग्य आहे का ?

उत्तर : स्वतःच्या मानाने तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधात बदल करणे चुकीचेच नाही तर धोक्याचे आहे. याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. यामुळे अचानक रक्तातली साखर कमी होऊ शकते किंवा वाढूही शकते. त्यामुळे मनाने गोळ्यांचे प्रमाण कमी जास्त करू नये. 

 

प्रश्न : वेगवेगळ्या उपचार पद्धतींनी मधुमेह कमी होतो असे सांगितले जाते. त्यावरून अनेकदा रुग्णाचा गोंधळ उडतो, अशावेळी कोणती उपचारपद्धती वापरावी ?

उत्तर : याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे तुमचे शरीर ज्या उपचार पद्धतीला सर्वाधिक प्रतिसाद देते ते उपचार घ्यावेत. शक्यतो दोन उपचार पद्धती एकतरी घेऊ नये. घेत असाल तर दोन्ही तज्ज्ञांना तशी कल्पना द्यावी. त्यामुळे उलट त्रास होणे टाळता येते. मधुमेह हा आजार न मानता आयुष्याचा साथी  मानून त्याची काळजी घेतली तर त्याचा त्रास होणार नाही हे मात्र नक्की !

टॅग्स :PuneपुणेdiabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स