शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

रक्तातील अशुद्ध तत्व फक्त 3 दिवसांतच दूर करतील 'हे' पदार्थ; स्वस्तात मस्त उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:57 IST

आपल्या शरीरात ऑक्सिजन, हार्मोन, क्लोटिंग फॅक्टर्स, शुगर, फॅट्स आणि रोगप्रतिकार शक्ती यांसारखी तत्व पोहोचवण्याचं काम रक्त करतं.

(Image Credit : relrus.ru)

आपल्या शरीरात ऑक्सिजन, हार्मोन, क्लोटिंग फॅक्टर्स, शुगर, फॅट्स आणि रोगप्रतिकार शक्ती यांसारखी तत्व पोहोचवण्याचं काम रक्त करतं. रक्त अशुद्ध झाल्यानंतर शरीरावर पुरळ, पिंपल्स येतात. तसेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते. एवढचं नाहीतर ताप, हृदयाचे ठोके वाढणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

शरीरामधील रक्ताचं काम ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडसारखी तत्व फुफ्फुसं आणि शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवणं आहे. तसेच रक्त पचन तंत्रातून पोषक तत्व शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवतं. 

रक्तामध्ये व्हाइट ब्लड सेल्स असतात. जे शरीरातील आक्रमक सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. तसेच रक्त शरीराची पीएच लेव्हल, तापमान आणि पाण्याची पातळीही नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. 

दरम्यान, लिव्हर आणि किडन्या रक्त स्वच्छ करण्याचं काम करतात. परंतु, अनियमित डाएट आणि जीवनशैलीमुळे रक्त अशुद्ध होण्याची लक्षणं अनेकांमध्ये दिसून येतात. लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तुमच्या आहारा थोडे बदल करून तुम्ही तुमच्या शरीरातील अशुद्ध झालेले रक्त नैसर्गिकरित्या स्वच्छ करू शकता. तसेच विविध रोगांपासून बचाव करू शकता. त्यामुळे डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

1. ब्लू बेरिज 

ब्लू बेरिजमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतात. एका संशोधनानुसार, ब्लू बेरी लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ब्लू बेरीजचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हे दही, दलिया या स्मूदीमध्ये एकत्र करू शकता. 

2. क्रेनबेरी 

क्रेनबेरी यूटीआयवर अत्यंत फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्व मूत्रमार्गातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि किडनीचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. क्रेनबेरीचा आहारात समावेश करण्यासाठी दलिया, स्मूदी किंवा सलाडच्या रूपात करू शकता. 

3. लसूण

जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये जेवण तयार करण्यासाठी लसूणाचा वापर करण्यात येतो. पण लसूण शिजवून खाल्यावर जेवढा फायदा होत नाही, जेवढा तो कच्चा खाल्यावर होतो. त्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये थोडासा कच्चा लसूण एकत्र करा. 

4. लिंबाचा रस 

दररोज लिंबाचा रस गरम पाण्यात एकत्र करून प्यायल्याने रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. तुम्ही शक्य असेल तर कोऱ्या चहामध्ये लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सेवन करू शकता. यामुळे फक्त रक्त शुद्ध होण्यास मदत होत नाहीतर शरीरातून सर्व विषारी तत्व दूर होण्यासही मदत होते. 

5. आलं

आल्याचे रक्त शुद्ध करण्यासोबतच इतरही अनेक फायदे होतात. आलं कच्च खाल्याने शरीराला जास्त फायदे होतात. आल्याचा वापर तुम्ही चहासोबत किंवा जेवणामध्ये करू शकता. रक्तातीत अशुद्ध तत्व दूर करण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आलं मदत करतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारFitness Tipsफिटनेस टिप्स