शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दररोज सकाळी ब्रश करण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्या, फायदे इतके की सवयच लावून घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:04 IST

निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं. जर तुम्ही सकाळी उठून दात घासण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायलं तर तुमच्या शरीराला अनेक फायदे (Health Benefits) होतात, असं आयुर्वेद आणि नॅचरल थेरेपींमध्ये (natural therapy) सांगण्यात आलं आहे.

आपल्या शरीरासाठी पाणी (Water) अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शरीराच्या एकूण वजनामध्ये ६० ते ७० टक्के वाटा पाण्याचा असतो. पाण्यामुळं शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं. जर तुम्ही सकाळी उठून दात घासण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायलं तर तुमच्या शरीराला अनेक फायदे (Health Benefits) होतात, असं आयुर्वेद आणि नॅचरल थेरेपींमध्ये (natural therapy) सांगण्यात आलं आहे.

ओन्ली माय हेल्थनुसार (OnlyMyHealth), आपल्या तोंडात असलेली लाळ जर सकाळी पाण्यासोबत पोटात गेली तर ती हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते. आज आम्ही तुम्हाला दात न घासता पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहेत.

1. बॉडी होईल डिटॉक्‍सअनेकांना बॉडी डिटॉक्स (Detox) करणं खूप कठीण काम वाटतं. मात्र, नॅचरल थेरपीनुसार, जर तुम्ही सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायले तर शरीरातील अनेक विषारी पदार्थ सहज बाहेर काढले जाऊ शकतात. दररोज सकाळी कोमट पाणी (Warm water) प्यायलं तर आपल्या तोंडातील लाळ एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. ही गोष्ट शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरते.

2. किडनी राहील निरोगीआपली किडनी (kidney) निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. सकाळी दात न घासता पाणी प्यायल्यानं किडनीशी संबंधित असलेल्या किडनी स्टोनसारख्या अनेक समस्या दूर होतात.

3. स्कीनसाठी उपयुक्तसकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे मुरुमांची (Pimples) समस्या दूर होते. यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. परिणामी आपली त्वचा (Skin) हेल्दी आणि नितळ राहते.

4. मेटॅबॉलिजम रेट वाढतोजे लोक दररोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लगेच पाणी पितात त्यांचा मेटॅबॉलिजम (metabolism) रेट फार चांगला असतो. यामुळं वजन वाढत नाही आणि आरोग्यही चांगलं राहतं.

4. केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीरसकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं केसांच्या मुळांतील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि केस मजबूत होण्यास मदत होते. ब्लड सर्क्युलेशन चांगलं असल्यास केसांची वाढदेखील (Hair Growth)चांगली होते.

5. वजन कमी करण्यासाठी उपयुक्तसकाळी दात न घासता पाणी प्यायल्यास वजन कमी (Weight loss) करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. सकाळी-सकाळी पाणी प्यायल्यानं मेटॅबॉलिजम रेट वाढतो आणि कॅलरीज् देखील बर्न होतात. त्यामुळं वजन नियंत्रित करण्याची इच्छा असेल तर सकाळी पाणी प्यावं.

सकाळी उठल्यानंतर दात न घासता फक्त एक ग्लास पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे ही सोपी सवय लावून घेण्यास हरकत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी