शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी घेतलं जाणारं 'हे' औषध किडनीसाठी घातक, कंपनीला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 10:51 IST

नव्या नियमानुसार, रॅपरवर ही सूचना देणं गरजेचं असेल की, याचा वापर किडनीसाठी अतिशय नुकसानकारक होऊ शकतो.

(Image Credit : irishmirror.ie)

अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी देशात सर्वात जास्त प्रमाणात एंटासिडचं सेवन केलं जातं. ही गोष्ट लक्षात घेऊन एंटासिडच्या विक्रीसंबंधी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमाचा मुख्य उद्देश रूग्णांची सुरक्षा वाढवणे हा आहे. नव्या नियमानुसार, एंटासिडच्या रॅपरवर ही सूचना देणं गरजेचं असेल की, याचा वापर किडनीसाठी अतिशय नुकसानकारक होऊ शकतो.

Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील ड्रग्स कंट्रोल जनरल द्वारे मंगळवारी एक सूचना जारी करण्यात आली. त्यात सर्वच राज्य अधिकाऱ्यांना आणि प्रोटॉन पंप इनहेबिटर्सच्या प्रत्यक्ष निर्मात्यांना विचारण्यात आले की, एंटासिड बाजाराचा एक मोठा भाग आहे आणि भरपूर प्रमाणात लोक हे औषध घेतात. पण या औषधाचा वापर किडनीसाठी घातक होऊ शकतो, याबाबतची सूचना पॅकेजिंगवर दिली गेली पाहिजे. त्यासोबतच ज्या औषधांमध्ये पॅंटोप्राजोल, ओमेप्राजोल, लांसोप्राजोल, एसोमप्राजोल आणि त्यांचं मिश्रण आहे, त्यांच्या पॅकेजिंगवरही ही सूचना दिली जावी.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुद्द्यावर गेल्यावर काही महिन्यात अनेक तज्ज्ञांद्वारे मूल्यांकल आणि केस स्टडी केली गेली. ज्यात नॅशनल को-ऑर्डिनेशन सेंटर फॉर फार्माकोविजिलेंस प्रोग्रामचा सुद्धा समावेश आहे. गेल्या काही दिवसात अ‍ॅंटी-अ‍ॅसिडीक पिल्सवर झालेल्या ग्लोबल स्टडीजमध्ये ही बाब समोर आली आहे की, गॅस आणि जळजळ सारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या टॅबलेट्सचं जास्त काळासाठी सेवन केल्याने किडनी डॅमेज, एक्यूट रेनल डिजीज, क्रोनिक किडनी डिजीज आणि गॅस्ट्रिक कॅन्सरसारख्या समस्या होतात. पण हा रिसर्च नेफ्रॉलजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यामुळे अनेक चिकित्सकांना या औषधांच्या साइडइफेक्ट्सबाबत माहिती नसावं असं होऊ शकतं.

प्रोटॉन पंप इनहेबिटर(PPI) जगभरातील टॉप १० प्रिस्क्राइब्ड ड्रग्सच्या श्रेणीत आहे. जे अ‍ॅसिड आणि अपचन समस्या दूर करण्यासाठी घेतले जातात. पण ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, अंतर्गत चिकित्सा आणि सर्जरी सारख्या विशेष स्थितीमध्येही नियमित रूपाने याचा वापर केला जातो. याचा व्यवसाय ४ हजार ५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी पीपीआयचा वापर साधारण २० वर्षांआधी सुरू झाला. तेव्हापासून हे औषध फार सुरक्षित असल्याची भावना आहे. पण यामुळे अनेकांना नुकसान झालं. त्यामुळेच या औषधांची विक्री कमी झाली आहे. याआधी यूएसमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.प्रदीप अरोरा यांनी बीएमसी नेफ्रोलॉजीमध्ये रिसर्च प्रकाशित केला. ज्याबाबत त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, पीपीआय काही सूचनेसोबतच प्रिस्क्राइब्ड केलं जावं आणि हा कालावधी केवळ ८ आठवड्यांचा असला पाहिजे. जर यापेक्षा अधिक काळासाठी रूग्णाला पीपीआय घेण्याची गरज पडत असेल तर त्यांच्या किडनी फंक्शन आणि मॅग्नेशिअम लेव्हलवर लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत