शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यास उद्ध्वस्त करी दारू; थंडीमध्ये अतिमद्यपान हृदयासाठी ठरते घातक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 10:05 IST

हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी, यासाठी अनेकजण दारूचे सेवन करतात.

मुंबई : ‘संसारास उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू’ हे वाक्य अनेकदा वाचायला-ऐकायला मिळते. ते काही अंशी सत्य आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी, यासाठी अनेकजण दारूचे सेवन करतात. परंतु, थंडीच्या मौसमात अतिमद्यपान करणे हृदयासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ‘आरोग्यास’ उद्ध्वस्त करी दारू, असे म्हटले तर वावगे होणार नाही. मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होते आणि हायपोथार्मियाचा धोका वाढतो. म्हणूनच थंडीच्या दिवसात हृदयाची काळजी घेण्यासाठी मद्यपान टाळा, रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब तपासून पहा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.

अतिमद्यपानाचा हृदयावरच नव्हेतर शरीरावरही विपरित परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊन ती कमकुवत होतात. ज्यामुळे हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नसल्याने हृदयाचा झटका येऊ शकतो.

 हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण दारूचे सेवन करत असल्याने त्यांना हृदयाची समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश रूग्ण उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तवाहिन्यांचे नुकसान अशा तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात. मधुमेहामुळे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची शक्यता वाढते. 

 जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास हृदयविकाराची समस्या टाळता येऊ शकते. यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. हृदयाची समस्या असलेल्यांनी अधिक व्यायाम करणे टाळावे, धूम्रपान व मद्यपान करू नयेत, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे. छातीत दुखणे आणि जडपणा, अशक्तपणा, यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. 

मद्यविक्री १३ टक्क्यांनी वाढली:

गेल्या काही महिन्यांपासून मद्यविक्री वाढल्याने राज्यातील बिअरच्या विक्रीत १३ टक्केपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे, तर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि देशी दारूच्या विक्रीत किंचित घट झाली आहे. या वर्षात आतापर्यंत राज्यातील दारूच्या एकूण विक्रीत ७.२९ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत १९.२५ कोटी लिटरची विक्री नोंदवली गेली, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत १२ कोटी लिटर होती. 

थंडीमध्ये शरीरातील रक्तवाहिन्या आखडतात. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. त्यात जर अति मद्यसेवन केले तर हृदयावर आणि शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर धूम्रपान, बदललेली जीवनशैली यामुळे देखील हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये हृद्यविकारांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे सर्व टाळायचे असेल तर सर्वप्रथम मद्यपान, धूम्रपान बंद करावे. तसेच जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. हरेश मेहता, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स