शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 10:46 IST

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं.

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं. पण हा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी गरजेचा आहे केवळ १५ मिनिटांचा वॉक. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जेवण केल्यावर १५ मिनिटे वॉक केल्याने डायबिटीजच्या रुग्णांना शुगर वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी फायदा होतो. हा रोज ४५ मिनिटे वॉक करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे.

अभ्यासक डी पेट्रो यांनी सांगितले की, 'दुपारी जेवण केल्यावर निर्माण झालेल्या इन्सुलिनचं प्रमाण दिवसभर कमी होत जाते. कारण दिवसा बरच चालणं-फिरणं होतं. तर रात्रीच्या जेवणानंतर बसून राहिल्याने ब्लड ग्लूकोज वाढण्याची शक्यता अधिक असते. याने धोका अधिक वाढतो. 

न्यूझीलॅंडच्या ओटागो यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, वॉकदरम्यान आपल्या शरीरातील मसल्स ग्लूकोजचा उपयोग करते, याने रक्तात शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे डायबिटीजच्या रुग्णांना शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. 

डायबिटीजमध्ये काय खावे?

डायबिटीज आज जगभरात आपले पाय पसरत आहे. भारतात जवळपास ४.५ कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. आधी डायबिटीजकडे वृद्धापकाळात होणारा आजार म्हणून पाहिले जात होते. पण आता हा आजार वृद्धांसोबतच तरुणांमध्येही दिसत आहे. डायबिटीज झाल्यावर रक्तात शुगरचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणं बंद होतं. अशात अनेक वेगवेगळ्या समस्याही होतात. डायबिटीजने ग्रस्त रुग्णांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर कंबर, पाय आणि पाठीच्या कण्याची हाडे कमजोर होतात.  

वेगवेगळ्या शोधांमधून समोर आलं आहे की, कॅल्शिअमचं सेवन केल्याने डायबिटीजचा धोका तर कमी होतोच, सोबतच हा आजार झाल्यावर त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमताही वाढते. जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या शोधानुसार, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर ग्लूकोज नियंत्रित करतं. सहा महिने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी खाण्याचा सल्ला दिल्यास डायबिटीजच्या रुग्णांच्या इन्सुलिनमध्ये फार सुधार होतो. निरोगी राहण्यासाठी १९ ते ५१ वर्षांच्या महिला-पुरुषांनी प्रतिदिन १ हजार मिलि ग्रॅम कॅल्शिअमचं सेवन केलं पाहिजे. वय ७१ वर्ष झाल्यानंतर १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम सेवन केलं पाहिजे.

नैसर्गिक पदार्थांमधून कॅल्शिअम

अ‍ॅलोपॅथी औषधे घेण्याऐवजी अनेक नैसर्गिक खाद्य पदार्थांमधून कॅल्शिअम मिळवता येऊ शकतं. या पदार्थांमधून कॅल्शिअम घेतल्यास त्याचे काही दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. गहू, राजमा, सोयाबीन, मूग, मटकी आणि चणे यांसारख्या धान्यांत भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. तसेच काकडी, गाजर, भेंडी, मेथी, कारलं, मूळा, टोमॅटो आणि रताळे यातूनही कॅल्शिअम भरपूर प्रमाणात मिळतं. यासोबतच अननस, आंबे, संत्री आणि नारळ यातूनही कॅल्शिअम मिळतं.

डायबिटोलॉजिया जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दह्याचं नियमीत सेवन केल्यावर डायबिटीज टाइप-२ धोका २८ टक्के कमी होतो. तेच दूध आणि दुधापासून तयार खाद्यपदार्थ जसे की, पनीर सेवन केल्यास शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण नियंत्रित राहतं. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स