शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 10:46 IST

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं.

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं. पण हा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी गरजेचा आहे केवळ १५ मिनिटांचा वॉक. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जेवण केल्यावर १५ मिनिटे वॉक केल्याने डायबिटीजच्या रुग्णांना शुगर वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी फायदा होतो. हा रोज ४५ मिनिटे वॉक करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे.

अभ्यासक डी पेट्रो यांनी सांगितले की, 'दुपारी जेवण केल्यावर निर्माण झालेल्या इन्सुलिनचं प्रमाण दिवसभर कमी होत जाते. कारण दिवसा बरच चालणं-फिरणं होतं. तर रात्रीच्या जेवणानंतर बसून राहिल्याने ब्लड ग्लूकोज वाढण्याची शक्यता अधिक असते. याने धोका अधिक वाढतो. 

न्यूझीलॅंडच्या ओटागो यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, वॉकदरम्यान आपल्या शरीरातील मसल्स ग्लूकोजचा उपयोग करते, याने रक्तात शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे डायबिटीजच्या रुग्णांना शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. 

डायबिटीजमध्ये काय खावे?

डायबिटीज आज जगभरात आपले पाय पसरत आहे. भारतात जवळपास ४.५ कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. आधी डायबिटीजकडे वृद्धापकाळात होणारा आजार म्हणून पाहिले जात होते. पण आता हा आजार वृद्धांसोबतच तरुणांमध्येही दिसत आहे. डायबिटीज झाल्यावर रक्तात शुगरचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणं बंद होतं. अशात अनेक वेगवेगळ्या समस्याही होतात. डायबिटीजने ग्रस्त रुग्णांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर कंबर, पाय आणि पाठीच्या कण्याची हाडे कमजोर होतात.  

वेगवेगळ्या शोधांमधून समोर आलं आहे की, कॅल्शिअमचं सेवन केल्याने डायबिटीजचा धोका तर कमी होतोच, सोबतच हा आजार झाल्यावर त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमताही वाढते. जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या शोधानुसार, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर ग्लूकोज नियंत्रित करतं. सहा महिने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी खाण्याचा सल्ला दिल्यास डायबिटीजच्या रुग्णांच्या इन्सुलिनमध्ये फार सुधार होतो. निरोगी राहण्यासाठी १९ ते ५१ वर्षांच्या महिला-पुरुषांनी प्रतिदिन १ हजार मिलि ग्रॅम कॅल्शिअमचं सेवन केलं पाहिजे. वय ७१ वर्ष झाल्यानंतर १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम सेवन केलं पाहिजे.

नैसर्गिक पदार्थांमधून कॅल्शिअम

अ‍ॅलोपॅथी औषधे घेण्याऐवजी अनेक नैसर्गिक खाद्य पदार्थांमधून कॅल्शिअम मिळवता येऊ शकतं. या पदार्थांमधून कॅल्शिअम घेतल्यास त्याचे काही दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. गहू, राजमा, सोयाबीन, मूग, मटकी आणि चणे यांसारख्या धान्यांत भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. तसेच काकडी, गाजर, भेंडी, मेथी, कारलं, मूळा, टोमॅटो आणि रताळे यातूनही कॅल्शिअम भरपूर प्रमाणात मिळतं. यासोबतच अननस, आंबे, संत्री आणि नारळ यातूनही कॅल्शिअम मिळतं.

डायबिटोलॉजिया जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दह्याचं नियमीत सेवन केल्यावर डायबिटीज टाइप-२ धोका २८ टक्के कमी होतो. तेच दूध आणि दुधापासून तयार खाद्यपदार्थ जसे की, पनीर सेवन केल्यास शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण नियंत्रित राहतं. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स