शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे काम चार वर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:34 IST

नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून बंद आहे. वन कायद्याच्या नावाखाली या रस्त्याचे बांधकाम खोळंबले ...

नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून बंद आहे. वन कायद्याच्या नावाखाली या रस्त्याचे बांधकाम खोळंबले आहे. यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहे. या रस्त्याचे खोळंबलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या कोहलगाव-गोठणगाव १४ किमी. रस्ता रूंदीकरण व दुरुस्तीसाठी सन २०१६-१७ मध्ये १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा रस्ता जंगलातून जात आहे, असे कारण पुढे करून नवेगावबांध येथील उपविभागीय वनअधिकारी मनोहर गोखले यांनी रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू होताच कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला काम बंद करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हापासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे. सद्यस्थितीत रस्त्याला २-३ मीटरचे खड्डे पडले आहेत. कोहलगाव-चिचगड-धाबेपवनी या २५ किमी.पर्यंत रस्त्याच्याकडेला घनदाट राखीव जंगल आहे. सन २०१९-२० मध्ये या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी वन विभागाचा वनकायदा नव्हता का? असा सवाल केला जात आहे.

.........

रस्त्याचे काम बंद

कोहलगाव-गोठणगाव हा रस्ता पूर्वीपासून असून, सन १९५० ते १९६० यादरम्यान इटियाडोह धरण बांधत असताना या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले होते. तेव्हापासून साकोली-केशोरी बससेवा सुरू आहे. या रस्त्याचे अनेक वेळा डागडूजीचे काम करण्यात आले होते. त्यावेळेस अनेक वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या रस्त्याने जात -येत असत; पण या रस्त्याचे काम अडविले नाही; परंतु गोखले स्वत:ला कार्यक्षम व कर्तव्यदक्ष असल्याचे समजून रस्त्याचे काम बंद केले.

...............

रखडलेल्या बांधकामाला जबाबदार कोण

वन विभागाने सन २०१८-२१ पर्यंत कालीमाटी जंगलात सहा शौचालय व सहा बाथरूमचे बांधकाम सागवन झाडे कापून केले होते, तसेच समाजमंदिरसुद्धा बनविण्यात आले होते. असे अनेक उदाहरणे आहेत; पण अधिकारीच धृतराष्ट्राच्या भूमिकेत काम करीत आहेत. मग कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे बांधकाम वनकायदा समोर करून का बंद करण्यात आले. या रस्त्याचे बांधकाम बंद करण्यास जबाबदार कोण? अधिकारी की लोकप्रतिनिधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.