शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी वाहनांविनाच

By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST

विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात

परतीचे आदेशच नाहीत : खासगी वाहनांचा वापर करताहेत पदाधिकारीगोंदिया : विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात आलेली शासकीय वाहने त्यांना परत करण्यात आलेली नाहीत. यामुळे या पदाधिकाऱ्यांना आपल्या खाजगी वाहनांचाच वापर करावा लागल्याचे चित्र दिसून आले.निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतील नियमांतर्गत पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने निवडणूक विभागाकडून मागवून घेतली जातात. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह अन्य पदाधिकारी ज्यांच्याकडे शासकीय वाहने आहेत त्यांच्याकडील वाहने जिल्हा निवडणूक विभागाने मागवून घेतली होती. आता मात्र निवडणूक संपली असून निकालही घोषीत करण्यात आले आहेत. मात्र पदाधिकारी शासकीय वाहनांपासून वंचित आहेत.याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता २२ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असून त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून आदेश येईपर्यंत शासकीय वाहने परत करता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले. यामुळे आता या पदाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस आपल्या शासकीय वाहनाशिवाय जुळवून घ्यावे लागणार असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)