शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

दवनीवाडा तालुका कधी घोषित होणार?

By admin | Updated: August 31, 2015 01:35 IST

गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १५ वर्षे होत आहेत, परंतु त्या अगोदरची जुनी मागणी दवनीवाडाला तालुका घोषित करण्याची मागणी आहे.

नागरिकांना प्रतीक्षा : ३० वर्षांपासून होत आहे मागणी परसवाडा : गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १५ वर्षे होत आहेत, परंतु त्या अगोदरची जुनी मागणी दवनीवाडाला तालुका घोषित करण्याची मागणी आहे. परंतु या दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी असणारी फाईल धूळ खात शासन दरबारी पडली आहे. सडक/अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे नवीन तहसील देऊन कामाला सुरूवात झाली. परंतु यापुर्वीची मागणी असूनही दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. दवनीवाडा तालुका घोषित करण्यात यावा यासाठी तिरोडा पंचायत समितीने ठराव ६ जून १९८५ ला व भंडारा जिल्हा येत असल्यामुळे जि.प. भंडारा जिल्ह्यात समावेश असताना सर्वसाधारण सभेत ५ नोव्हेंबर १९९६ ला घेण्यात आला. तत्कालीन जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णकुमार जायस्वाल तत्कालीन जि.प. सदस्य यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यांना अनुमोदन म्हाडाचे सभापती व तत्कालीन सदस्य नरेश माहेश्वरी, तत्कालीन सदस्य केशव मानकर, पुरूषोत्तम वशिष्ट सदस्यांनी मुद्दा सभागृहात एकमताने पारीत करून घेतला.गोंदिया पंचायत समिती ठराव ६ सप्टेंबर २००५ व १३ डिसेंबर १९९० ला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी दवनीवाडा तालुका निर्माणचा ठराव पत्र मिळाल्याचे पत्र तत्कालीन हरिष मोरे यांना व समितीला दिले होते. दवनीवाडा तालुक्यासाठी केशोराव पारधी यांचे महसूल मंत्री यांना पत्र १६ जुलै १९८५, राजकुमारी बाजपेई यांचे पत्र भाई सावंत मंत्री यांना २१ जानेवारी १९८६ ला, शरद पवार यांचे पत्र २० आॅगस्ट १९९०, रजिन देशमुख यांचे हरीश मोरे यांना पत्र २३ आॅगस्ट १९९०, केवलचंद जैन यांचे पत्र सुधाकर नाईक मंत्री यांना ७ सप्टेंबर ९०, चुन्नीलाल ठाकुर यांचे मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९०, हरिहरभाई पटेल यांचे पत्र मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९०, छेदीलाल गुप्ता यांना आमदाराचे पत्र १३ डिसेंबर ९०, शरद पवार यांचे पुन्हा पत्र १३ डिसेंबर ९०, खुशाल बोपचे खासदार असताना ५ मार्च ९१, प्रफुल पटेल खासदार असताना बाळासाहेब केदार मंत्री यांना ८ सप्टेंबर २०१२, माजी आ. भैय्यालाल पटले यांचे २४ एप्रिल ९३ ला शिफारस पत्र, हरिश मोरे आमदार असताना विलासराव देशमुख यांना ३१ जुलै ९३, विलासराव देशमुख यांचे पत्र हरीश मोरे यांना २९ नोव्हेंबर ९४, मुख्यमंत्री शरद पवार असताना हरीश मोरे ला पत्र ६ डिसेंबर ९४, विलास मुत्तेमवार केंद्रीय मंत्री असताना महसूल मंत्री यांना २६ नोव्हेंबर ९५ ला पत्र, भजनदास वैद्य यांचे महसूल मंत्री यांना १३ डिसेंबर ९५, रमेश कुथे यांचे मनोहर जोशी यांना १० मार्च ९६ ला, भजनदास वैद्य आमदार असताना नारायण राणे महसूल मंत्री यांना १६ डिसेंबर ९६ वैद्य यांचे जिल्हाधिकारी यांना ३ डिसेंबर ९८ व महादेवराव शिवणकर पालकमंत्री असताना ४ डिसेंबर ९८ वैद्य यांचे नारायण राणेला पुन्हा १८ डिसेंबर ९८, रमेश कुथे यांचे ही राणेला २२ डिसेंबर ९८, आर.आर. पाटील ग्राम विकास मंत्री असताना १३ डिसेंबर २००० राजेंद्र जैन यांचे १४ डिसेंबर २०१०, प्रफुल पटेल वाहतुक मंत्री असताना १४ डिसेंबर २०१०, पटेल यांचे पृथ्वीराज चव्हाण यांना ९ जुलै २०१३ बाळासाहेब थोरात यांना ही पत्र देण्यात आले. सतत पाठपुरावा करण्यात आला. परंतु येथील नागरिकांच्या हाती निराशाच आली. दवनीवाडाला आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदाराचे कार्यालय उघडण्यात येतील असे सांगण्यात आले होते. पण तेही फक्त कागदोपत्रीच राहिले. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)