शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपासाठी सौरऊर्जेचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST

स्वस्त धान्य दुकानदार विमा याेजनेपासून वंचित कोहमारा : कोरोना संक्रमण महामारीच्या संचारबंदी काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्डधारकांना धान्यपुरवठा करण्याचे कर्तव्य ...

स्वस्त धान्य दुकानदार विमा याेजनेपासून वंचित

कोहमारा : कोरोना संक्रमण महामारीच्या संचारबंदी काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्डधारकांना धान्यपुरवठा करण्याचे कर्तव्य बजाविणारे स्वस्त धान्य दुकानदार विमा सुरक्षा कवचापासून वंचित आहेत. कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा बळी गेला असताना त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापपर्यंत विम्याचा मोबदला मिळाला नाही.

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

सौंदड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या निर्देशांचे पालन केले जात नाही.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.

तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

अर्जुनी-मोरगाव : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

रेतीसाठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडलेला असतो.

शेंडा ते आपकारीटोला मार्ग होतोय अपघाताचे केंद्र

शेंडा-कोयलारी : शेंडा ते आपकारीटोला या रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याच मार्गावर जीवघेणे वळण असल्याने समोरून येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढलेल्या झुडपांची छाटणी करून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरातील बस फेऱ्या नियमित सुरू करा

नवेगावबांध : कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महााविद्यालये सुरू केली आहेत. परंतु विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत.