शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

By admin | Updated: February 20, 2015 01:23 IST

आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार..

साखरीटोला : आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. आजपर्यंत अनेक बळी घेणाऱ्या या वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून सदर वळण मृत्युचा सापळा झाले आहे. दि. १८ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान भरधाव मोटारसायकलची वळणावर असलेल्या झाडाला धडक बसली. यामुळे दोन इसम जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये शंकर धनुराम पाचे (२१) मु. सतोना, सोनू उर्फ नरेश पाचे (२१) मु.बालाघाट यांचा समावेश आहे. ताराचंद धर्मू पाचे (२५) मु.सतोना जि. गोंदिया हा इसम गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त मोटारसायकल होंडा कंपनीची असून नव्याने खरेदी करण्यात आली होती. तिघे मित्र साखरीटोला तेथे फिरायला आले होते. तेथून हरदोलीकडे परत जाताना तेलीटोला वळणावर मोटरसायकल चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे गंभीर दुखापत होवून बराच वेळपर्यंत तिघेही घटनास्थळीच पडून होते. त्यात दोघांचा बळी गेला. सालेकसा पोलिसांना याची माहिती मिळताच रात्रीच्या १२ वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविण्यात आले. या घटनेने सदर वळण हे नवीन वाहनधारकांसाठी मृत्युचे कारण बनत असल्याची प्रचिती आली. पुन्हा सदर वळणावर अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)नियोजित पत्नीला भेटायला मित्रासह गेला होताया अपघातातील गंभीर जखमी ताराचंद धर्मू पाचे याचे काही दिवसांपूर्वीच हरदोली येथील बालाराम पाचे यांच्या मुलीशी लग्न जुळले आहे. त्यामुळे ताराचंद व त्याचे दोन सोबती सासूरवाडीला महाशिवरात्रीनिमित्त आले होते. बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिघेही साखरीटोल्याला फिरायच्या निमित्ताने आले होते. पण तेथून परत जाताना त्यांच्यातील दोघांवर काळाने झडप घातली. एका दुचाकीवर तिघेजण बसणे त्यांना महागात पडले.बांधकाम विभाग अजूनही निद्रावस्थेतअनेकदा या वळणावर बरेच अपघात होऊन कित्येक जणांचा हकनाक बळी जात असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काही घेणे-देणे नसल्याचे जाणवते. इतके अपघात होऊनही या ठिकाणी ‘अपघातप्रवण स्थळ’ अशी सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही. अतिवळण असल्याने येथे अपघात होतात. जर सदर वळणाचे सरळीकरण झाले तर अपघात टाळता येतील. याबाबतीत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून जागृती केली आहे. मात्र अधिकारी निद्रावस्थेत आहेत. त्यामुळे सदर वळणाचे सरळीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सालेकसाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, ओबीसी आघाडीचे पप्पू राणे, पृथ्वीराज शिवणकर, मुलचंद कटरे, धनजित बैस यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.