शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

वृक्षांवर प्रेम करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:05 IST

आई-वडिलांनी झाडं लावली, त्यात भर घालण्याऐवजी वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे. वृक्षलागवड ही आपली संस्कृती आहे. ती आई वडिलांची परंपरा आपण टिकवून ठेवली पाहिजे.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : ग्राम खामखुरा येथे वृक्षलागवड

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : आई-वडिलांनी झाडं लावली, त्यात भर घालण्याऐवजी वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे. वृक्षलागवड ही आपली संस्कृती आहे. ती आई वडिलांची परंपरा आपण टिकवून ठेवली पाहिजे. मानवाला जिवंत राहण्यासाठी आॅक्सीजनची गरज असते. तो झाडांपासून मिळतो. प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्याच्या व्यवस्थेसाठी नैतिक जबाबदारी समजून परंपरा टिकविली तरच देश समृद्ध होईल, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.महाराष्टÑ शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत ग्राम खामखुरा येथे घेण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोहर चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल, किशोर तरोणे, मंदा कुंभरे, रचना गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.चे माजी सभापती उमाकांत ढेंगे, ग्राम वडेगावच्या सरपंच खुणे, ग्राम झरपडाच्या सरपंच कुंदा डोंगरवार, लोकपाल गहाणे, नगरसेविका गीता ब्राम्हणकर, पोलीस निरीक्षक एस.एस. कुंभरे, नाना शहारे, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्रविण बडगे, ग्राम खामखुराचे सरपंच अजय अंबादे, पं.स.च्या माजी उपसभापती आशा झिलपे, परिविक्षाधिन वनपरिक्षेत्राधिकारी पूनम पाटे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले उपस्थित होते.या वेळी मार्गदर्शन करताना चंद्रिकापुरे यांनी, एकजुटीने वृक्षलागवड केली पाहिजे. दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या नावे किमान १० झाडे लावली पाहिजे व त्यांच्या जोपासनेची जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे. आजची युवापिढी उद्याचे भवितव्य आहे. त्यांनी वृक्षलागवडीची धुरा सांभाळली पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामानाने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय औद्योगिकीकरण वाढल्यामुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. यावर वृक्षलागवड हाच उत्तम व एकमेव मार्ग आहे. त्यासाठी ही चळवळ म्हणून राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पूनम पाटे यांनी मानले. कार्यक्रमात एस.एस.जे. महाविद्यालयाचे एनएसएस पथक, जय दुर्गा हायस्कूल गौरनगर, तिबेटीयन सेटलमेंट, नवतरुण गणेश मंडळ खामखुरा, युवाशक्ती मंडळ खामखुरा, संपादन वडेगाव, गायत्री परिवार माहुरकुडा तसेच वडेगाव, इसापूर, इटखेडा, खामखुरा, कोरंभी, बुधेवाडा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे योगदान लाभले.या मोहिमेंतर्गत अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील ग्राम खामखुरा येथे २२ हजार २२०, निमगाव येथे २२ हजार २२०, धाबेटेकडी (तिडका-६) येथे १६ हजार ६६५, निलज-तावशी येथे १५ हजार व धाबेटेकडी येथे पाच हजार ५५५ या प्रकारे एकूण ८१ हजार ६६० झाडांची लागवड करण्यात आली.कार्यक्रम पत्रिकेत गोंधळवनपरिक्षेत्र कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ दिसून आला. पहिल्या वृक्षलागवड कार्यक्रमात बोंडगावदेवी येथे माजी खा. नाना पटोले यांनी वृक्षमित्र करंडक पुरस्काराची घोषणा केली होती. या पत्रिकेत काही माजी पदाधिकाºयांची नावे समाविष्ट आहेत. मात्र पटोले यांच्या नावाचा उल्लेख नाही. याच पत्रिकेत सर्व जि.प. सदस्यांची नावे आहेत. मात्र जि.प. सदस्य तेजूकला गहाणे, किशोर तरोणे व सहा पं.स. सदस्यांची नावे नाहीत. तर स्व. नानाजी मेश्राम या मृत पं.स. सदस्यांचे नाव पत्रिकेत नमूद आहे. पत्रिकेतील या गोंधळाची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्र शासनाचा हा महाउपक्रम असतानाही यात विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती.