शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीच्या माध्यमातून गावांचा समतोल विकास शक्य

By admin | Updated: March 30, 2015 01:18 IST

ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची प्रमुख जबाबदारी असते.

बोंडगावदेवी : ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची प्रमुख जबाबदारी असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गावखेड्याचा विकास साधून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. प्रभाग समितीच्या आढावा बैठकीतून गावपातळीवरच्या विकासाभिमुख कार्याला गती देता येते. अनेक समस्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्गी लावल्या जावू शकतात. जिल्हा परिषद प्रभाग समितीच्या नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीतून क्षेत्रातील गावांचा समतोल विकास साधल्या जावू शकतो, असे प्रतिपादन बोंडगावदेवी जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा जि.प. प्रभाग समितीचे अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केले. बोंडगावदेवी जि.प. प्रभाग समितीच्या १९ व्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पिंपळगाव-खांबी येथील जि.प. व प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी पिंपळगावचे प्रज्ञा डोंगरे, निमगावचे देवाजी डोंगरे, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे धार्मिक गणवीर, खांबीचे शारदा खोटेले उपस्थित होते. या बैठकीला क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य, शिक्षण कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा, वनविभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिवणकर म्हणाले की, शासनाचा विकास कामांसाठी भरपूर निधी येतो. तो निधी आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. जागरूक लोकप्रतिनिधी असला तर विकासाला खिंड पडू शकत नाही. प्रभाग समितीची आढावा बैठक नियमित घेणे गरजेचे आहे. आपल्या जि.प. क्षेत्राचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रामीण जनतेच्या समस्यांची पूर्तता व्हावी, विविध शासकीय योजनांची माहिती गावपातळीवरील सामान्य माणसाला सहज उपलब्ध होऊन लाभ मिळावा यासाठी बोंडगावदेवी जि.प. प्रभागाची आढावा बैठक नियमित घेण्याचा आपला माणस असल्याचे ते म्हणाले. या बैठकीच्या माध्यमातून क्षेत्रातील ग्रामीण भागाचा समतोल विकास साधणे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. काही कामचुकार अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमुळे गावातील सामान्य माणसाला व्यवसायापासून दूर राहावे लागते ही शोकांतिका आहे. विषय प्रमुखांनी जनतेच्या प्रश्नाला अग्रक्रम देऊन विकासात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीची कारवाई प्रभाग समितीचे सचिव तथा पं.स. कृषी अधिकारी ऊईके यांनी पार पाडली. आढावा बैठकीत आरोग्य विभागाचे डॉ.ए.सी.सिरसाट, पशुसंवर्धन विभागाचा डॉ. वाघाये, शिक्षण विभागाचा केंद्रप्रमुख बी.डब्ल्यु. भानारकर, खेताडे, रतनपुरे, अभियंता ए.आर.शेख उपस्थित होते. (वार्ताहर)