शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

गावापर्यंत लालपरी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता.

ठळक मुद्देप्रतिसाद नाही : जेमतेम डिझेल खर्च निघतोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दैनंदिन जनजीवन रूळावर आणण्यासाठी राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला आता गावांपर्यंत फेऱ्यांची परवानगी १५ जूनपासून दिली आहे. मात्र जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने सध्या तालुकास्थळापर्यंत सुरू असलेल्या फेऱ्यांचा जेमतेम डिझेल खर्च निघत असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात सध्यातरी गावापर्यंत लालपरी धावणार नाहीच अशी माहिती आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता. विस्कटलेली ही घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य शासनाने मे महिन्यात राज्य परिवहन महामंडळाला तालुकास्थळापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, जिल्ह्यात गोंदिया आगाराच्या ५० फेऱ्या सुरू असून यातून जेमतेम डिजेल खर्च निघत आहे. कोरोनाच्या दहशतीने नागरिक गावातल्या गावात किंवा परिसरातच आपली कामे आटोपून घेत असून बसने प्रवास करणे टाळत असल्याचे दिसत आहे. परिणामी बस फेऱ्यांना प्रतिसादच नाही. त्यात आता राज्य शासनाने सोमवारपासून (दि.१५) गावापर्यंत फेऱ्या सोडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यात तालुकास्थळापर्यंतच्या फेऱ्यांनाच प्रतिसाद नसताना गावापर्यंत फेऱ्या चालवून काहीच फायदा निघणार नाही.उलट नुकसान होण्याचीच जास्त शक्यता दिसून येत आहे. नेमकी हीच बाब हेरून जिल्ह्यात सध्या तरी गावापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळेच गावापर्यंत लालपरी पोहचणार नसल्याचे दिसत आहे.रूग्ण संख्येने जिल्हावासी दहशतीतगोंदिया जिल्ह्यात सुरूवातीला १ रूग्ण निघाल्यानंतर सुमारे ३९ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात स्फोटच झाला व ही आकडेवारी आजघडीला १०१ पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील फक्त देवरी तालुक्यातून रूग्ण आढळून आले नसून उर्वरित ७ तालुक्यात रूग्ण मिळून आले आहेत. रूग्ण वाढीची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हावासी दहशतीत आले आहेत. त्यामुळे गावातून बाहेर निघणे व त्यातल्या प्रवास करण्याचा धोका सर्वच टाळत आहेत. परिणामी एसटी फेऱ्यांना प्रतिसाद नाही.

टॅग्स :state transportएसटी