शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

सालेकसाच्या नळांमध्ये पाणी नाही…हरघर नळ योजना अजून पोहोचलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:13 IST

१० वर्षे लोटूनही पिण्याच्या पाण्याची समस्या : ६७ कोटींच्या योजनेला मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगरपंचायतला १० वर्षे लोटली तरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट असून आजही अनेक ठिकाणी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. नगरपंचायत क्षेत्रात आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल नळ योजना बेपत्ता असून प्रत्येक घरी नळ आणि त्या नळाला शुद्ध पाणी केव्हा मिळेल हे अजिबात सांगता येत नाही.

सन २०१५ मध्ये सालेकसा नगरपंचायतची घोषणा झाल्यानंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत लोकशाही पद्धतीने नगरपंचायतवर सत्ता स्थापित झाली होती. तेव्हा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक नगरपंचायतवर निवडून गेले. त्यापैकी चार नगरसेवकांना सभापतीपद मिळाले यामध्ये शिक्षण व आरोग्य, अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतींची निवड झाली. अशात नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी नगरपंचायत क्षेत्रात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे काही प्रयत्न केले असतील त्यात ते अपुरे पडले आणि नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही. 

आजही काही भागात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, पाणीपुरवठा योजनेंतर्गत महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गरीब गरजू कुटुंबांना नगरपंचायतद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. तर दुसरीकडे नगरपंचायतची पाणी पुरवठा व्यवस्था तोकडी ठरत आहे.

नगरपंचायत प्रशासनामार्फत मागील नगरपंचायत रचनेप्रमाणे सालेकसा क्षेत्रात एकूण १७ ठिकाणी सौर उर्जेची जोडणी करून बोअरवेलच्या माध्यमातून गावातील प्रमुख ठिकाणी नळ योजना लावण्यात आली आहे. परंतु यापैकी अनेक ठिकाणी नळ योजना बंद पडली असून जिथे सुरू आहे तिथे लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कारण, एकाच ठिकाणी नळ असल्यामुळे संपूर्ण मोहल्ल्यातील लोक त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येतात. अशात पाण्याची समस्या अजून दूर झालेली नाही. सालेकसा परिसरात बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा, हलबीटोला या ठिकाणी पाण्याची समस्या कायम आहे.

दोन बोअरवेलच्या माध्यमातून सहा हजार लोकांना पाणी पुरवठानगरपंचायत अंतर्गत खामगाव खुर्द परिसरात लोकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेलच्या भरोवशावर अवलंबून रहावे लागत आहे. यामध्ये पंचायत समिती परिसरात असलेल्या एक बोअरवेल द्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरून गावाला पुरवठा केला जातो. तर रेस्ट हाऊस परिसरात असलेली दुसरी बोअरवेल रेल्वे स्थानक परिसरातील वस्तीमध्ये पाणीपुरवठा करीत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याची टाकी भरण्यासाठी पाच ते सहा तास एवढा वेळ लागत असतो. पाच ते सहा हजार लोकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही.

शहराला ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षाशहरासह नगरपंचायत परिसरातील जवळपास आठ गावांना नियमितरित्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत ६७ कोटींची पाणी पुरवठा योजना मंत्रालयातून मंजूर करून घेण्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. शहरातील लोकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याची उत्सुकता येथील नागरिकांना लागली आहे. ही योजना तयार झाल्यावर लोकांना नियमित मुबलक पाणी उपलब्ध होईल. परंतु मंजुरी केव्हा मिळेल आणि काम केव्हा होणार हे सांगता येत नाही.

"नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर करवून घेण्यासाठी स्थानिक आमदार तसेच संबंधित मंत्रालयात सतत पाठपुरावा केला जात आहे. योजना तयार झाल्यावर पाण्याची समस्या कायमची दूर होईल."- शालिनी बडोले, सामाजिक कार्यकर्ता, सालेकसा

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात