शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

५८ जणांचे स्वॅब नमुने पाठविले तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गोंदिया येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. तर पहिला कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच मागील २२ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही.

ठळक मुद्देआतापर्यंत १४१ नुमन्यांचा अहवाल प्राप्त : ७० जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरूवारपर्यंत (दि.२३) एकूण १९९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. हे सर्व १४१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर उर्वरित ५८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात गोंदिया येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. तर पहिला कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच मागील २२ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा पृूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीला थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने गुरूवारी (दि.२३) ५८ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सध्या जिल्ह्यातील ४ शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ७० जण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल मध्ये ४७, गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज मध्ये १०, चांदोरी येथे १२ आणि लहीटोला १ अशा एकूण ७० व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजीव दोडके यांनी सांगितले.जिल्ह्यात तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटरकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने वेळीच उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे आमगाव, नवेगावबांध व येरंडी येथे प्रत्येकी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. सर्व सेंटर जवळील ग्रामीण रु ग्णालय आणि उपजिल्हा रु ग्णालयाशी सलग्न करण्यात आले आहे. यावर येथील वैद्यकीय अधीक्षकांचे लक्ष राहणार आहे.गावकरी घेत आहेत दक्षताराज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतरही बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून नागरिक येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी गावबंदी करून बाहेरून गावात येणाऱ्यांना १४ दिवस गावातील शाळेतच क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या