शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शंभर टक्के प्रगतीसाठी अध्ययन स्तर निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:47 IST

शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजि.प. शाळांमध्ये राबविणार उपक्रम। गुणवत्ता वाढीवर भर

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १३८४ शाळांचा समावेश राहणार आहे.या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित व अंशत:अनुदानित शाळांना दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर निश्चिती तपासणीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल.तपासणीत भाषा व गणित विषयाचा अध्ययनस्तर निश्चित केला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मूलभूत क्षमता प्राप्त करण्यात विद्यार्थ्यांना जी समस्या येते, ती समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.कार्यक्रमांतर्गत भाषा व गणित विषयाच्या तपासणीसाठी शाळांना टेस्टिंग टूल्स उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. या अंतर्गत प्रारंभ,मध्यम व अंतिम चाचणी होईल. या उपक्रमासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा साधन व्यक्ती (डीआरपी) समितीत १३ लोकांचा समावेश आहे. समितीचे प्रशिक्षण २६ ते २९ जुलै दरम्यान नागपूर येथे घेण्यात येणार आहे.यानंतर जिल्ह्यात तालुका साधन व्यक्ती (बीआरसी) चे प्रशिक्षण होईल.या समितीत १३ लोकांचा समावेश राहणार आहे. या समितीद्वारे केंद्रीय साधन गट (सीआरजी) ला पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे.या गटात १५ जणांचा समावेश राहील. हा गट केंद्र स्तरावर काम करणार आहे.महाराष्ट्र सरकारने २२ जून २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.यातून ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा निर्मिती, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिब्लिटी), पीएसआर (पब्लिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी) सारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना हॉयटेक विद्यार्थी करण्याचे काम सुरू करण्यात आले.वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे उपक्रमही राबविण्यात आले.आता मुख्यमंत्र्यांकडून शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या केआरए (राऊंड एरिया) अनुसार शंभर टक्के स्कूल व प्रगत विद्यार्थी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.शेजारच्या राज्यांच्या बोलीभाषेचा पडतो प्रभावछत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेला लागून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा व गोंदिया तालुक्याची सीमा लागून आहे. या तिन्ही तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेवर या दोन राज्याच्या बोलीभाषेचा प्रभाव पडतो. या प्रकारे काही तालुके आदिवासी बहुल असल्यामुळे स्थानिक बोलीभाषेचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो.या विपरीत परिस्थितीत ‘असर’ सर्वेक्षण २०१६ च्या अहवालात गोंदिया जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर होता. सन २०१८ मध्ये ७ व्या क्रमांकावर राज्यात तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता.

टॅग्स :Educationशिक्षण