शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे दिवसा सुरू व रात्रीला बंद

By admin | Updated: December 21, 2014 23:01 IST

मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत तर बदल केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये

गोंदिया : मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत तर बदल केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकाराकडे नगर परिषद विद्युत विभागाचे व अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील मुख्य मार्गांच्या दुतर्फा व वॉर्डांमध्ये नागरिकांच्या सोयीकरिता पथदिवे लावण्यात आले आहे. हे पथदिवे चालू व बंद करण्याची जबाबदारी नगर परिषद विद्युत विभागाची आहे. शिवाय नगर परिषदेने यासाठी एका खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र मागील १५ दिवसांपासून शहरातील पथदिवे सकाळी ११ वाजतापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील काही भागात मात्र रात्रीच्या वेळेस मागील १५ दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जाव लागत आहे. ही परिस्थिती आजची नाही तर यापूर्वी सुध्दा असा प्रकार अनेकदा घडला आहे.
दिवसा पथदिवे सुरू राहत असल्याने व रात्रीच्या वेळेस ते बंद ठेवण्यात येत असल्याने शहरात दिवसा उजेड आणि रात्री अंधार अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिक तर नगर परिषदेने शहरातील पथदिवे रात्री बंद ठेऊन दिवसा सुरू ठेवण्याचा निर्णय तर घेतला नाही ना? असा सवाल करीत आहे. विशेष म्हणजे न.प.अतर्गंत येणाऱ्या वीज वितरण व्यवस्थेची देखभाल दुरूस्ती करण्याकरिता नगर परिषदेत स्वतंत्र विद्युत विभागाची स्थापना करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र मागील १५ दिवसांपासून शहरातील पथदिवे सकाळी ११ वाजतापर्यंत सुरू राहत असल्याने या विभागाचे कर्मचारी नेमके काय करीत आहेत. यावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर मागील महिनाभरापूर्वीच वीज वितरण कंपनीने थकीत वीज देयकाअभावी न.प.अतर्गंत येणाऱ्या शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. दिवसाही पथदिवे सुरू राहत असल्याने अतिरिक्त वीज देयकाचा फटका देखील नगर परिषदेला बसत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
वीज वाचवाचा मंत्र दिला जात असताना नगर परिषदेकडून असला प्रकार केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे दिवसा उजेड रात्री अंधार असल्याचे चित्र गोंदिया शहरात पाहायला मिळत आहे. नगर परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात दिवसालाही दिवे सुरू राहतात. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन असल्या प्रकारांवर आळा घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)