शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली.

ठळक मुद्देगृहभेटीच्या उपक्रमाला सुरूवात : हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीच्या प्रात्यक्षिकावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोव्हीड-१९ विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेची माहिती देत हात धुन्याचे प्रात्यक्षिक देण्याचे कार्य वडेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका भाग्यश्री केळवतकर करीत आहेत. यासाठी वडेगाव व परिसरातील गावात त्यानी गृहभेटीच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली. त्यामुळे गर्दी पसरू नये, यासाठी त्यानी ‘एकला चलो रे’ प्रमाणे घरोघरी जावून लोकांना हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन व कोरोना विषाणूबाबत, त्याच्या प्रतिबंधाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती देण्याचे कार्य सुरू केले. तसेच शिंकतांना व खोकतांना तोंडावर रूमाल घेतला पाहिजे.बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास हाताद्वारे अथवा एखाद्या वस्तुवर ड्रॉपलेट्स असल्यास नाक, तोंड व डोळ्याद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. कोणत्याही वस्तुला हात लावल्यावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साबणाने तांत्रिक पद्धतीने हात धुन्याचे मार्गदर्शन भाग्यश्री या नित्यनेमाने करीत आहेत. कोणताही ताप अथवा सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांकडे जाताना आपण आजारी असल्यास इतरांना संसर्ग होवू नये म्हणूनच मास्क वापरावे, अथवा मास्क वापरू नये असा सल्ला गावकऱ्यांना देत आहे. दरम्यान आपली रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.त्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला गृहभेटीतून त्यात देत आहेत. शासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच संपूर्ण देशात कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरातच राहावे, गर्दीच्या ठिकाणात जाण्याचे टाळावे तथा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या